टाकळीभान(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : 15 ऑँगस्ट रोजी ग्रामसभा घेण्यात न आल्याने काल आयोजित केलेल्या ग्रामसभेला महिला व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते. ग्रामसभा सुरू होताच सर्वच प्रभागातून आलेल्या महिलांनी माईकचा ताबा घेवून पाणी प्रश्न व घरकुल प्रश्नावर हल्लाबोल करीत सारा परिसर दणाणून टाकला. तर बापूसाहेब नवले यांनी हंडा, कळशी आणून ग्रामसभेत प्रवेश केला व या भांड्यांचा आवाज करून ‘पाणी द्या, पाणी,’ अशी मागणी केली. पाणी देता येत नसेल तर नैतीक जबाबदारी म्हणून सर्व सदस्यांनी राजीनामे देण्याची मागणी केली.
ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच अर्चना रणनवरे होत्या. यावेळी ग्रामविकास अधिकारी आर. एफ. जाधव यांनी अहवाल वाचन केले. यावेळी माजी सभापती नानासाहेब पवार म्हणाले की, आज लोकांसमोर पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. लोकांना पिण्याचे पाणी उपल्बध करून देणेकामी ग्रामपंचायत प्रशासन कमी पडत असल्याचे चित्र दिसून येत असल्याने अगोदर ग्रामपंचायतीने प्राधान्याने येथील जनतेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्यवस्थितरित्या करावा, असे आवाहन केले.
यावेळी अशोकचे माजी अध्यक्ष ज्ञानदेव साळुंके, माजी सरपंच मंजाबापू थोरात, उपसरपंच कान्हा खंडागळे, माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे, अशोकचे कारेगाव भाग संचालक शिवाजी शिंदे, सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष राहुल पटारे, माजी उपसरपंच भारत भवार, पाराजी पटारे,अविनाश लोखंडे, प्रा.जयकर मगर, यशवंत रणनवरे आदी उपस्थित होते. पवार पुढे म्हणाले की, चार वर्षापासून आपली चारशे घरकुले रखडली आहे. त्यातली फक्त 115 घरकुले झाली आहेत. उर्वरीत घरकुलांसाठी शासनाने या घरकुलाबाबत स्वत:ची जागा पाहीजे अशी अट घातल्याने काही लोकांची घरकुल राहीले. या संदर्भात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर बैठक होऊन आहे त्या जागेवरच बांधून मिळण्याबाबत चर्चा झाली. लवकरच या घरकुलांचे कामांचे उद्घाटन मंत्री विखे पाटलांच्या हस्ते करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.
माजी सरपंच मंजाबापू थोरात म्हणाले की, भविष्यात पाण्याचे दुर्भिष्य लक्षात घेता भंडारदरा धरणाच्या खाली होणार्या पावसाचे पाणी तसेच धरणाच्या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून टाकळीभान टेलटँक अगोदर भरून घ्यावा. व नंतर निळवंडे धरण भरण्यात यावे, असा ठराव मांडला. उपसरपंच कान्हा खंडागळे म्हणाले की, ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. सध्यस्थितीत येथील बाजारसमितीकडे असणारी बाकी वसूल करण्यात यावी.
तसेच पेठेतून गेलेल्या मेनलाईनला अनधिकृत नळ कनेक्शन आहे. ते कन्केशन बंद करावे किंवा त्यांच्यावर कारवाई करावी. जेणेकरून बाकी लोकांना व्यवस्थित पाणीपुरवठा होईल. ग्रामसभेत राहुल पटारे, माजी उपसरपंच पाराजी पटारे, नारायण काळे, बापूसाहेब शिंदे, अनिल बोडखे, आण्णासाहेब दाभाडे, बापू नवले, रामभाऊ आरगडे, सुप्रिया धुमाळ, देवा कोकणे, संजय रणनवरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
महिलांचा सत्ताधार्यांवर प्रश्नांचा भडिमार
या ग्रामसभेत पहिल्यांदाच महिलांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावून आपल्या समस्यांचा पाढाच या ठिकाणी वाचून दाखविला. प्रत्येक वार्डातून आपआपल्या अडचणी घेवून महिला वर्ग या ठिकाणी सत्ताधार्यांना जाब विचारण्यासाठी आल्या होत्या. महिलांनी एकामागून एक प्रश्नांची शरबती सत्ताधार्यांवर केली. त्यामुळे सत्ताधार्यांची यावेळी चांगलेच भंबेरी उडाली. आक्रमक झालेल्या महिलांना उत्तर देण्यात सर्वांचीच तारांबळ होताना दिसली.
हेही वाचा
लवंगी मिरची : मग विकास नक्कीच होईल!
जादूटोण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाला गंडा
नाशिक : बक्षिसाचे आमिष दाखवून वृद्धास अडीच लाखांचा गंडा
The post टाकळीभान : पाण्यावरुन महिलांनी गाजवली ग्रामसभा appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SvRxz1
मिरजगाव : पुढारी वृत्तसेवा : शेतकर्यांनी मिरजगाव व कर्जत येथील अधिकृत आडते व्यापारी यांनाच उडदाची विक्री करावी. हिशेब पट्टी व तोलाई पावत्या घ्याव्यात, असे आवाहन कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर यांनी केले आहे. कर्जत तालुक्यातील खरीप हंगामात पेरणी केलेला उडीद सध्या मोठ्या प्रमाणावर बाजारात विकायला येत आहे. मिरजगाव व कर्जत येथील बाजार समितीच्या आवारात अधिकृत आडते व्यापारी हा उडीद खरेदी करत आहेत. असे असताना कर्जत तालुक्यातील काही ठिकाणी खासगी व्यापारी कमी दराने उडीद खरेदी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे उडीद उत्पादक शेतकर्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीने नेमलेल्या परवानाधारक व्यापार्यांनाच उडीद द्यावा व त्यांच्याकडून हिशेब पट्टी व तोलाई पावती घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
उडदाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होणार असल्याने, याचा गैरफायदा घेण्यासाठी काही खासगी व्यापारी बाहेर कमी दराने उडीद खरेदी करत आहेत. यामध्ये शेतकरी व मार्केट कमिटी या दोघांचाही तोटा होत आहे. शिवाय भविष्यात शासनाची काही योजना आली, तर खासगीत उडीद खरेदी केलेल्या व्यापार्यांना शेतकरी कोणतीच पावती मागू शकत नाहीत. यामुळे असे शेतकरी शासकीय योजनेपासून वंचित राहू शकतात. यासाठी शेतकर्यांनी अधिकृत आडते व्यापार्यांनाच उडीद विक्री करावी. अधिकृत किंवा खासगी व्यापारी कमी दराने उडीद खरेदी करीत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा सभापती तापकीर यांनी दिला आहे. यावेळी उपसभापती आबासाहेब पाटील उपस्थित होते.
मिरजगाव भागात खरीप हंगामात पेरणीपूर्वी अतिवृष्टी झाली होती. यामुळे या भागात उडदाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. तसेच, कुकडी पट्ट्यात दोनदा पाणी आले. यामुळे कर्जत तालुक्यातील उडीद पिकाचे सरासरी लागवड क्षेत्र वाढले आहे. यामुळे उडदाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होणार आहे. एकूण क्षेत्राचा विचार करता यावर्षी उडदाचे क्षेत्र कमी झाले आहे. गेल्या वर्षी 25 हजार हेक्टर क्षेत्रावर उडदाची पेरणी झाली होती. तर, यावर्षी फक्त 13 हजार हेक्टरवर उडदाची पेरणी झाली आहे. मात्र, मिरजगाव व कर्जत येथील क्षेत्र वाढले आहे. यामुळे संस्थेच्या हितासाठी सर्व व्यवहारावर लक्ष ठेऊन संस्थचे उत्पन्न कसे वाढेल, याची दक्षता घेतली जाणार आहे.
उडीद पेरणी क्षेत्रात पन्नास टक्के घट
उडीद उत्पादनात कर्जत तालुका राज्यातील टॉप थ्री मध्ये होता. गेल्या वर्षी पेरणी, उत्पादन व उडदाला सर्वाधिक दर देण्यात तालुका आघाडीवर होता. मात्र, यावर्षी पाऊस कमी झाल्याने उडीद पेरणी क्षेत्र पन्नास टक्के घटले आहे. यामुळे उडदाची मागणी पूर्ण होईल असे वाटत नसल्याचे तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी सांगितले.
हेही वाचा :
नाशिक जिल्ह्यात टंचाईच्या झळा, जनावरांसाठी सहा महिने पुरेल इतकाच चारा शिल्लक
नगर : दरोडेखोरांच्या रिक्षाचा सिनेस्टाईल पाठलाग
The post परवानाधारक व्यापार्यांनाच उडीद द्या : सभापती काकासाहेब तापकीर appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SvPG6p
Magnet Motor और Copper Wire से बनी Free Energy क्या काम करेगी ? | How to Make Free Energy at home
Magnet Motor और Copper Wire से बनी Free Energy क्या काम करेगी ? | How to Make Free Energy at home 🔷 My Second Vlog Channel - https://www.youtube.com/channel/UC4peTMBMdXQucuoJLtxtMRg ⚫ Follow me on :- INSTAGRAM - https://instagram.com/technicalsokil FACEBOOK - https://facebook.com/technicalsokil TWITTER - https://twitter.com/technicalsokil 🔵 My Other Popular Videos Link - ► अपने घर पर Solar System खुद ही कैसे लगाए | Solar Panel Connection for Home with Inverter & Battery - https://youtu.be/YrQOXclXSkQ ► इस वीडियो को देखने के बाद आप एक भी खराब Led बल्ब नहीं फेकोगे | 100% Guarantee ✅ | Led Bulb Repair - https://youtu.be/VDBdGsbMsSY ► How to Make Amazing Electric Board | 3 in 1 Gadgets | GIVEAWAY🔥🔥🔥 - https://youtu.be/cPRTSjIxWAc ► Instant Water Heater | बिजली बचाये | 100% Safe | बिल्कुल सस्ता 🔥🔥 - https://youtu.be/p5bAtnFCiaI ► Soldering Iron | How to Make usb Soldering Iron 🔥🔥🔥 - https://youtu.be/DWjABCcNt6k ► How to Make Bike Battery | Life time Bike Battery | Hamesha ke liye Bike Battery Ka Jhanjhat Khatam - https://youtu.be/_FANAw8pquY ► Inverter बनाये सिर्फ 200 रुपए में | How to Make Inverter 12V to 150W-200W 🔥🔥🔥 - https://youtu.be/ICcSlF_0J9E ► How to Make Automatic Emergency Light for Power Cut - Easy life hacks - https://youtu.be/DP1MfLsQfko ► Very Easy and Simple to Make USB Speaker at home - DIY Only in 12₹ - https://youtu.be/05A8-EqA94g ► How to Make Powerful Power bank at home - https://youtu.be/KJjaamqG_ks ► How to Make 12 Volt Battery Charger (EASY-WAY) - https://youtu.be/U7MAeFidkI0 ► Homemade Power bank 22000 mAh Only Rs 150/- - https://youtu.be/LQOvOxjnAvY ✅ Subscribe Us on Youtube www.youtube.com/technicalsokilTS For Business Enquiry Email :- [email protected] Don’t Forget To Like , Comment , Share & Subscribe [ THANKS FOR WATCHING THIS VIDEO ] Technical Sokil #freeenergy #magnetfreeenergyrealorfake #realorfakefreeenergy #freeenergymotor #technicalsokil
via YouTube https://www.youtube.com/watch?v=4q-3d-KFfik
अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : शासनाने कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी प्रतिक्विंटल 350 रुपयांप्रमाणे अनुदान जाहीर केले. मात्र, शासन आणि सहकार विभागात ‘कागद पे कागद’ सुरुच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र 55 हजार शेतकर्यांचे 33,37,817 क्विंटल कांद्याचे 116 कोटी रुपये अजुनही मिळालेले नाहीत. दरम्यान, हे अनुदान लवकरच वर्ग होणार असल्याचे सहकार विभागाकडून सांगितले जाते. मध्यंतरी कांद्याचे भाव गडगडल्याने शासनाने शेतकर्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रतिक्विंटल 350 रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर झाला. त्यासाठी जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्या मार्गदर्शनात शेतकर्यांचे प्रस्ताव बोलाविण्यात आले.
जिल्ह्यातून 78752 शेतकर्यांनी कागदांची जुळवाजुळव करून आपले प्रस्ताव सादर केले. मात्र यात छाननी झाली आणि 23 हजार शेतकरी अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे या शेतकर्यांचा भ्रमनिराश उवर्रीत 55368 शेतकरी अनुदानास पात्र असल्याचा अहवाल पुढे पाठविण्यात आला. संबंधित पात्र शेतकर्यांनी 33 लाख 37 हजार क्विंटल विकलेल्या कांद्याला प्रतिक्विंटल 350 रुपये प्रमाणे 116 कोटी 82 लाख 36 हजार रुपयांचे अनुदान यादी तयार करण्यात आली. तशी मागणी शासनाकडे पाठविण्यात आली. मात्र अजुनही ही रक्कम शेतकर्यांना मिळालेली नाही. काही जिल्ह्यांत दोन टप्प्यात हे अनुदान दिले जात आहे. तर नगर जिल्ह्यात अजुन एकही टप्पा आलेला नाही. दरम्यान, शासनाच्या निर्देशनानुसार नुकतीच जिल्हा सहकार विभागाकडून कांदा अनुदान लाभार्थ्यांची सुधारीत मागणी आकडेवारी पाठविली आहे. त्यामुळे आतातरी हे अनुदान प्राप्त होईल, अशी अपेक्षा आहे.
तालुका शेतकरी अनुदान
नगर 21768 50,65,42,817
अकोले 366 57,20,491
संगमनेर 5818 13,17,17,668
कोपरगाव 5141 88,91,100
राहाता 1225 2,03,45,447
श्रीरामपूर 1142 2,61,83,517
राहुरी 4063 5,20,47,677
नेवासा 3161 6,34,28,634
शेवगाव 668 80,64,441
पाथर्डी 211 20,43,968
जामखेड 1839 3,79,44,585
कर्जत 811 1,71,24,775
श्रीगोंदा 1130 3,72,55,862
पारनेर 5478 11,73,74,820
साईराज 178 2,86,90,674
संवत्सर 484 71,57,566
गोदावरी 23 1,80,460
ओमचैतन्य 1538 3,65,94,848
प्रसन्ना 206 56,57,505
नाफेड 38 10,49,300
एकूण 55368 116,82,36,065
हेही वाचा
छत्रपती संभाजीनगर: लोहगाव येथे विद्युत तारेवरील कावळा काढताना वायरमनचा मृत्यू
जगातील सर्वात सुंदर घोडा
निगडी पीसीएमसी वसाहत इमारतींची दुरवस्था
The post अहमदनगर जिल्ह्यातील कांदा उत्पादकांचे 116 कोटी कागदावरच! appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SvLbyN
فيديو جديد (خابي لام) تحشيش مضحك جداً 😂 | مقاطع تيك توك
فيديو جديد (خابي لام) تحشيش مضحك جداً 😂 | مقاطع تيك توك
via YouTube https://www.youtube.com/watch?v=Wadw8ThlwbI
Slow Motion Inside Perspective of Lock Getting Bumped Open.
Lock bumping gear featured can be found at https://covertinstruments.com/
via YouTube https://www.youtube.com/watch?v=S9w_EUc0qAE
राहुरी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : ‘शेतात रोटा का मारला’, असे विचारल्याचा राग आल्याने 11 जणांनी सुनील शिंगाडे या तरूणाला लाथा- बुक्क्यांसह दांड्याने मारहाण केली. ही घटना तालुक्यातील कणगर येथे (दि. 21 ऑगस्ट) रोजी घडली. सुनील शिंगाडे (वय 28 वर्षे) हा तरूण कणगर येथे राहतो. कणगर गावात वडाचे लवण शिवारात त्याची शेती आहे. शेजारी सुभेदार बाबुलाल शेख (रा. मोमीन आखाडा, ता. राहुरी) याची जमीन आहे.
(दि. 21 ऑगस्ट) रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास सुनील शिंगाडे त्याच्या शेतात गेला. तेव्हा शब्बीर शेख हा शिंगाडे याच्या शेतात ट्रॅक्टरने रोटा मारत होता. सुनील शिंगाडे त्याला म्हणाला, ‘माझ्या शेतात रोटा का मारतो,’ असे विचारल्याचा त्याला राग आल्याने त्याच्यासह इतरांनी सुनिल शिंगाडे यास दांडक्याने मारहाण केली. शिंगाडे यांच्या फिर्यादीनंतर शब्बीर बाबुलाल शेख, राजु बाबुलाल शेख, सुभेदार बाबुलाल शेख, राजु शेख, दोन मुले, शब्बीरचा मुलगा व अन्य 4 ते 5 अशा 11 जणांवर गुन्हा दाखल झाला.
हेही वाचा
गणेशोत्सवात रात्री 12 पर्यंत मेट्रो सुरू राहणार : उपमुख्यमंत्री अजित पवार
नाशिक : वणी -सापुतारा रस्त्यावर भरधाव कारची दुचाकीला धडक, दुचाकीचालक गंभीर
नेवाशात चोरलेली बोअरची गाडी थेट तामिळनाडूतुन ताब्यात
The post राहुरी : अकरा जणांकडून तरुणास दांड्याने जबर मारहाण appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SvHzLv
संगमनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : गुंजाळवाडी चौफुली ते वेल्हाळे रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्टदर्जाचे होत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या गुंजाळवाडीसह वेल्हाळे परिसरातील नागरिकांनी एकत्र येत काम बंद पाडले, मात्र ठेकेदाराने ग्रामस्थांना विश्वासात न घेता पुन्हा परस्पर काम सुरू केल्याने संतप्त झालेले भाजपा किसान आघाडीचे प्रमुख रविंद्र थोरात व माजी उपसरपंच अमोल गुंजाळ यांनी उप अभियंत्यासह ठेकेदाराला चांगलेच धारेवर धरीत जाब विचारला.
संगमनेर ते वेल्हाळे रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून मंजूर झाला आहे. या रस्त्याचे काम दोन महिन्यांपूर्वी सुरू झाले होते, परंतु काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने परिसरातील नागरिकांनी ते बंद पाडले. यावेळी काम सुरू करण्याअगोदर मला फोन करा, असे रविंद्र थोरात यांनी ठेकेदाराला सांगितले होते, मात्र ठेकेदाराने कोणालाही न विचारता तीन दिवसांपूर्वी पुन्हा काम सुरू केले.
ठेकेदाराने रस्त्याची स्वच्छता न करता निकृष्ट दर्जाच्या दगड- गोट्यांची खडी वापरुन, त्यावर कमी प्रतीचे डांबर टाकण्याचे काम सुरू केले. ही बाब गुंजाळवाडी चौफुली परिसरातील नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी भाजप किसान आघा डीचे राज्य सदस्य रविंद्र थोरात यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. थोरात यांनी चौफुलीजवळ जाऊन सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी केली. काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. थोरात व गुंजाळवाडीचे माजी उपसरपंच अमोल गुंजाळ यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी काम बंद पाडले.
रस्त्याचे काम परिसरातील नागरिकांनी बंद पाडल्याचे समजताच साबांचे उप अभियंता ठाकरे घटनास्थळी आले. रविंद्र थोरात यांनी त्यांच्यावर प्रश्नाचा भडीमार केला. मला विचारल्याशिवाय काम सुरू करू नका, असे ठेकेदाराला सांगितले होते. तरीसुद्धा न ऐकता पुन्हा काम सुरू केल्यामुळे ठाकरे यांच्या समक्ष ठेकेदारास थोरात यांनी जाब विचारला. रस्त्याचे डांबरीकरण केल्यानंतर दोन वर्षात खड्डे पडले. ते ठेकेदार स्वखर्चाने भरून देतील, अशी तजवीज त्यांच्या टेंडरमध्ये केली आहे. त्यामुळे ते कसे चुकीचे काम करतील, असे सांगत त्यांनी ठेकेदाराची पाठराखण करण्याचे काम केले. यानंतर थोरात चांगलेच संतप्त झाले. त्यांनी ठेकेदारासह उपअभियंत्यास चांगले धारेवर धरले. चांगले काम न झाल्यास मी पालकमंत्री विखे पां. यांचा रस्त्याच्या कामाची पाहणी करण्याचा दौरा लावेल, अशी तंबी थोरात यांनी ठेकेदारास दिली.
गुंजाळवाडी चौफुली ते वेल्हाळे या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. कामाच्या दर्जाबाबत महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्याकडे तक्रार करणार आहोत. ठेकेदाराने रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे न केल्यास पालकमंत्र्यांकडे कारवाई करण्याची मागणी करणार आहे.
– रविंद्र थोरात, भाजप किसान आघाडी राज्य सदस्य
हेही वाचा
घोसपुरी-चिखली-कोरेगाव एमआयडीसीसाठी हालचाली
अहमदनगर बाजार समितीमध्ये भाजी बाजाराला होणार सुरुवात
नेवाशात पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात
The post संगमनेर : गुंजाळवाडी रस्त्याचे काम पाडले बंद! appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SvFZmF
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील चार तरुणांना झाडाला उलटं टांगून अमानुष मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेळी चोरी केल्याच्या संशयातून ही घटना घडली आहे. या घटनेमुळं जिल्ह्यातून संताप व्यक्त होत आहे. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील काही दिवसापूर्वी शेळी आणि कबुतर चोरीला गेले होते. चोरीचा संशय या चार तरूणांवर होता. यावरून काल शुक्रवारी सकाळी चार तरुणांना त्यांच्या घरातून उचलून नेत त्यांचे कपडे काढून त्यांना झाडाला उलटे लटकवून अमानुष मारहाण करण्यात आल्याची माहीती पीडितांच्या कुटुंबियांनी दिली आहे. या घटनेत हे तरुण जबर जखमी झाले आहेत.
जखमी तरुणांना शिरापूर येथील कामगार हाॅस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणातील संघटनांनी आवाज उठवायला सुरूवात केली असून आरोपींना तातडीनं अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी हाॅस्पीटलमध्ये जावून या तरुणांची भेट घेतली आहे. संबधीत मारहाण करणाऱ्यांवर श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा
नाशिक : वणी मुळाणे रस्त्यावर मुळाणेकर ग्रामस्थांनी वृक्षारोपण करून केला निषेध
वडेट्टीवार यांना मोठा नेता असल्याचे दाखवावे लागते : बावनकुळे
पिंपरी : अग्निशमन यंत्रणेकडे सोसायट्यांचे दुर्लक्ष
The post अहमदनगर हादरलं ! झाडाला उलटं टांगून तरुणांना बेदम मारहाण; नेमकं काय आहे प्रकरण? appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SvCpHS
संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत झालेल्या 81 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी 21 जणांवर शहर पोलीसात एमपीआयडी अर्थात महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय आस्थापना मधील )हितसंबंधाचे रक्षण करण्याबाबतचे वाढीव कलम लावण्यात आले आहे. तसेच पोलीस कोठडीची मुदत संपलेल्या व्यवस्थापक व लेखापरीक्षकासह पाचही जणांना न्यायाधीश मनाठकर यांनी 4 दिवसाची पोलीस कोठडी पुन्हा सुनावली.
संगमनेर येथील दूधगंगा नागरी पत संस्थेत 80 कोटी 79 लाख 41 हजार 981 रुपयाचा अपहार झाला आहे. या प्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष व माजी जि प. सदस्य भाऊसाहेब कुटे, यांच्यासह पत्नी विमल, शकुंतला, मुलगा दादासाहेब, संदीप, अमोल आणि सून सोनाली पतसंस्थेचा व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ, अकाउंटंट स्व . भाऊसाहेब गायकवाड, तात्कालीन लेखापरीक्षक अमोल क्षीररसागर, कर्जदार चेतन कपाटे, कृष्णराव कदम ,त्याची पत्नी प्रमिलाताई कदम, मुलगा अजित कदम, सुजित कदम, संदीप जरे, अरुण बुरुड, लहानु कुटे, उल्हास थोरात, सोमनाथ सातपुते, उत्तम लांडगे यांच्यासह 21 जणांवर शहर पोलिसात अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतसंस्थेचा व्यव थापक आणि तात्कालीन लेखापरीक्षक याच्यासह तीन कर्मचारी अशा 5 जणांना अटक केली आहे. मात्र पतसंस्थेचा चेअरमनसह त्याचे सर्व नातेवाईक फरार आहे.
पोलिसात ज्या ठेवीदा रांच्या ठेवी दूधगंगा पतसंस्थेत आहेत. त्या ठेवीदारांनी आपल्या ठेवीचा पुरावा म्हणून पावत्या आणि दिलेला फॉर्म भरून पोलिसांकडे दाखल करावा असे आवाहन पो. नि. भगवान मथुरे यांनी केले होते, ठेवीदारांनी आपल्या ठेवीच्या सर्व पावत्या आणि अर्ज भरून शहर पोलिसांकडे जमा केले आहेत. त्या ठेवींचा विचार करत अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेल्या सर्व 21 जणांवरती एमपीआयडी हे वाढीव कलम लावण्यात आले आहे. त्यामुळे आता ठेवीदारांच्या ठेवींना खर्या अर्थाने संरक्षण मिळणार आहे.
सध्या अटकेत असलेला पतसंस्थेचा व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ लेखापरिक्षक अमोल क्षीरसागर याच्यासह लहानु कुटे, उल्हास थोरात आणि सोमनाथ सातपुते या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्या सर्वांची गुरुवारी पोलीस कोठडीची मदत संपली होती. त्यांना न्यायालयात न्यायाधीश मनाठकर यांच्यासमोर हजर केले असता दि. 28 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी काम पाहिले आहे
हेही वाचा
प्रदूषणाचा आरोग्यावर परिणाम कसा होतो?
राज्यात 108 रुग्णवाहिका सेवा होणार ठप्प?
पोलंडमधील प्राचीन दफनभूमीत सापडले चांदीचे दागिने
The post संगमनेर : दूधगंगा अपहारातील 21 जणांवर एमपीआयडी कलम appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Sv8FHr
CSK गाडीचं जुगाड 👌#indianfarmer #jugaad #shorts
Title --CSK गाडीचं जुगाड 👌#indianfarmer #jugaad #shorts #csk #car #engine #tyre -------------------------------------------------- To learn more about farming - 📹 Subscribe to our channel ‘Indian Farmer’- https://www.youtube.com/c/IndianFarmer 💻Our website - https://indianfarmer.in/ 📷 Follow us on Instagram - https://www.instagram.com/indianfarmer/ 🏪 Our Store - https://amzn.to/3iqNwzy 📧 Contact us at - [email protected] About us: - We at Indian Farmer are working unanimously to shatter misconceptions about farming. We are a youtube channel, a community of farmers, and also farmers ourselves. Our team specializes in creating solutions across farming and building projects. This organic combination of farm love and content creation will build solutions across boundaries. This passion project has grown its wings into diverse fields like entrepreneurship, tech, content creation, etc. We started with tackling day-to-day issues faced by farmers and now we are a family of 6M+ people striving to make lives better! Our mission is to transform people’s perspectives about agriculture and provide the best solutions in the easiest ways possible. If you have any feedback or requirements, please don't hesitate to reach out to us. We are grateful for your support, and we look forward to continuing to share our knowledge with you! Come join our family and welcome yourself to a world where nature and tech combine into harmony. Thank You!
via YouTube https://www.youtube.com/watch?v=e5DdA0L_r1I
| life is difficult | Atharva Sudame |
via YouTube https://www.youtube.com/watch?v=Pkw9OKpAHds
Test Output TRQ HHO Generator Kit - Transparan 9,5 Ampere Max
via YouTube https://www.youtube.com/watch?v=-lWsskepQvQ
राशीन(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : दारूच्या नशेत पोलिसांना खोटी माहिती देणार्या तालुक्यातील जलालपूर येथील दीपक भीमराव माने (वय 45) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस कॉन्स्टेबल मनोज मुरकुटे यांना 22 ऑगस्ट रोजी राशीन पोलिस दूरक्षेत्रात तत्काळ मदत पुरवणार्या डायल 112 करिता नेमण्यात आले होते. त्या वेळी त्यांना सकाळी 11.49 वाजता कॉल आला. कॉल करणार्या व्यक्तीस त्याच्या मुलाने मारहाण केली आहे, यात तो जखमी झाला आहे. मला तत्काळ पोलिस मदत हवी आहे अन्यथा मी आत्महत्या करतो, असे त्यावर सांगण्यात आले. मुरकुटे यांनी तत्काळ त्या क्रमांकावर कॉल केला. त्यास घटनास्थळ विचारले. त्याने जलालपूर (ता. कर्जत) सांगितले.
मुरकुटे यांनी तेथे जाऊन खात्री केली. त्या वेळी कॉल करणारा दीपक भीमराव माने दारूच्या नशेत आढळून आला. त्यास कोणीही मारहाण केली नव्हती. मुरकुटे यांनी त्यास फिर्याद द्यायची असेल, तर राशीन पोलिस दूरक्षेत्रात येऊन दे, असे सांगितले. त्याने पुन्हा डायल 112 ला दोनदा कॉल केला. पोलिस ठाण्याला खोटी माहिती दिल्याने मुरकुटे यांनी त्याच्याविरुद्ध फिर्याद दिली.
हेही वाचा
पुणे : पिंपळाच्या झाडाची फांदी कोसळली थेट ग्राहकांच्या डोक्यावर
इंग्रजांना पळविले, तसे दोन्ही सरकारला पळवू : नाना पटोले
रशियाच्या खासगी लष्कर वॅगनर प्रमुखांचा विमान अपघातात मृत्यू
The post राशीन : पोलिसांना खोटी माहिती देणार्याविरुद्ध गुन्हा appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Sv5c2q
राहुरी : पुढारी वृत्तसेवा : केंद्र शासनाने कांद्याबाबत निर्यातीवर 40 टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेताच शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बाजार समिती बंदच्या आवाहनाला राहुरीमध्ये चांगलाच प्रतिसाद मिळाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांनी शासनाकडे कांद्याला 3 हजार रुपये दर देण्याची मागणी केली आहे. अन्यथा शुक्रवारी (25 ऑगस्ट) रोजी नगर मनमाड रस्त्यावर चक्काजाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
केंद्राकडून कांदा निर्यातीवर 40 टक्के अतिरीक्त शुल्कचा निर्णय होताच कांदा उत्पादक शेतकर्यांचा संताप पहावयास मिळत आहे. नगर जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसून आले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांनी बाजार समितीमध्ये शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत जोपर्यंत शासन कांद्याला 3 हजार रुपये प्रतिक्विंटल दर जाहिर करीत नाही, तोपर्यंत बाजार समिती बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. शेतकर्यांसह बाजार समितीमधील व्यापार्यांनी शेतकरी हित लक्षात घेता राहुरी बाजार समितीमध्ये कांदा खरेदी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. शेतकर्यांच्या कांद्याला भाव मिळावा, हीच भावना बाजार समितीचे पदाधिकारी व व्यापार्यांची असल्याचे सांगत राहुरी बाजार समितीमध्ये कांदा खरेदी विक्री झालीच नाही. बाजार समितीमध्ये शुकशुकाट पसरल्याचे दिसून आले.
शेतकर्यांचा रुद्रावतार पाहता शासनाकडून दोन लाख मे.टन कांदा खरेदीचा निर्णय होऊन कांद्याला 2 हजार 410 रूपये दर देण्याचा निर्णय जाहिर झाला. परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शासनाच्या निर्णयाला विरोध दर्शवित कांद्याला किमान 3 हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळावे, अशी मागणी केली आहे. शासनाने निर्यातीला 40 टक्के अतिरीक्त शुल्क लावले ते मागे घेण्यात यावे. 31 मार्च पर्यंत खरेदी केलेल्या कांद्याला 350 रूपये प्रतिक्विंटल अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्याचे अवलोकन व्हावे या प्रमख मागण्या शासनाकडे ठेवण्यात आलेल्या आहेत.
या आशयाचे निवेदन घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोरे यांसह प्रकाश देठे, सतिष पवार, जुगलकुमार गोसावी, सचिन पावळे, आनंद वने, सचिन गडगुळे, रविंद्र निमसे, सचिन म्हसे, राहुल करपे, भारत वामन, सुनिल इंगळे, प्रविण पवार, प्रमोद पवार, अमोल पवार, भाऊसाहेब दिवे, अमोल दिवे, बाळासाहेब काळे, बापुसाहेब बाचकर, दिनेश वराळे, किशोर वराळे, अमित पर्वत आदींनी एकत्र येत राहुरी तहसील कार्यालयामध्ये संताप व्यक्त केला. तहसीलदार चंद्रजित रजपूत यांच्याकडे निवेदन देत शासनाने तत्काळ आमच्या मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा 25 ऑगस्ट रोजी चक्का जाम आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
शेतकर्यांचा अंत पाहू नका : मोरे
केंद्र व राज्य शासन जेवढा खर्च जाहिरातीवर करीत आहे. त्यापैकी निम्मा खर्च जरी शेतकर्यांच्या प्रश्नावर केला तर शेतकर्यांच्या आत्महत्या थांबतेल. अनुदानाच्या कागदी घोषणा होतात. प्रत्यक्षात शेतकर्यांना ऑनलाईनच्या फंद्यात अडकवून ठेवले जाते. शासनाने शेतकर्यांचा अंत पाहू नये. स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी हितासाठी लढा देत राहू असे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांनी सांगितले.
हेही वाचा :
भाड्याने ग्रामसेवक पाहिजे.! सोशल मिडियावर जाहिरात होते आहे व्हायरल
लासलगाव मार्केट कसे बनले आशियातील सर्वांत मोठे कांदा मार्केट?
The post राहुरी बाजार समितीत कांदा विक्रीला नकार appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Sv30NW
पारनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पारनेर तालुका बाजार समितीत शेतकर्यांच्या शेतमाल विक्रीवरील कडता कपात बंद केल्याशिवाय तालुका परिवर्तन फाउंडेशन आपले आंदोलन थांबविणार नाही, असे परिवर्तनचे अध्यक्ष सचिन भालेकर यांनी स्पष्ट केले आहे. मागील दोन वर्षांपासून पारनेर तालुका परिवर्तन फाउंडेशनचा कडता पद्धतीला प्रखर विरोध असून, याबाबत आंदोलन सुरू केले आहे. 17 जुलैला याबाबत दिलेल्या निवेदनानंतर बाजार समितीने कडता बंद करण्याचे आश्वासन दिले.
मात्र, त्याच्या विरोधात व्यापार्यांनी लिलाव बंद करीत शेतकर्यांची अडवणूक केली. यामध्ये सहभागी झालेल्या व्यापार्यांचे परवाने तातडीने रद्द करण्याची मागणी भालेकर यांनी केली आहे. याबरोबरच बाजार समितीचे संचालक आणि सचिवांवरही कारवाई करण्याबाबत पणन महामंडळाकडे तक्रार दिली असल्याचे भालेकर यांनी सांगितले. कडता बंद करण्यासाठी बाजार समितीचे संचालक अशोक कटारिया, व्यापारी संचालक भळगट यांनी अर्बन बँक येथे भालेकर यांची भेट घेऊन त्यांना 8 सप्टेंबरपर्यंत मुदत मागितली आहे.
परंतु, आतापासूनच कडता कापला जाणार नाही, असे आश्वासन भालेकर यांनी कटारिया यांच्याकडे मागितले. त्यावर कटारिया यांनी तातडीने कडता बंद करत असून, आठ तारखेपर्यंत बाजार समिती व्यापार्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेईल, असे आश्वासन दिले आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत कउता बंद झाला पाहिजे, अशी भूमिका भालेकर यांनी घेतली आहे.
रेपाळे यांनी जाहीर माफी मागावी
बाजार समिती आणि व्यापार्यांची बदनामी परिवर्तन फाउंडेशनने केल्याची खोटी माहिती देऊन दिशाभूल करणार्या व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मारूती रेपाळे यांचा भालेकर यांनी निषेध केला आहे. जोपर्यंत रेपाळे हे जाहीर माफी मागत नाहीत, तोपर्यंत कोणत्याही मुद्द्यावर तडजोड केली जाणार नाही आणि चर्चाही केली जाणार नाही, अशी भूमिका परिवर्तनने घेतली आहे.
आता जाहीर सभेमध्येच चर्चा
कडता बंदच झाला पाहिजे, अशी परिवर्तनची भूमिका असून त्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. यापुढे बंद खोलीत बैठक होणार नाही. व्यापारी, बाजार समितीचे सर्व संचालक आणि शेतकरी यांच्यासमोर जाहीर सभेमध्ये यावर चर्चा होईल आणि त्यामध्ये निर्णय घ्यावा लागेल, असे भालेकर यांनी सांगितले. लिलाव बंद करणार्या व्यापार्यांचे परवाने रद्द होण्यासाठी प्रसंगी न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा
अहमदनगर : केंद्र शासन शेतकर्यांच्या मुळावर! जिल्ह्यातील उत्पादक शेतकर्यांसह नेतेही आक्रमक
पिंपरी : महापालिका हद्दवाढीबाबत मुख्यमंत्री सकारात्मक; खा. श्रीरंग बारणे यांची माहिती
पिंपरी : विनाहेल्मेटधारकांना नोटिसा; 7 महिन्यांत 4000 दुचाकीस्वारांवर कारवाईचा बडगा
The post पारनेर : कडता बंद करण्यावर ‘परिवर्तन’ठाम; त्याशिवाय आंदोलन थांबणार नाही appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Sv0HyM
रूईछत्तीशी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील रूईछत्तीशी परिसरातील खरीप पिके पावसाअभावी करपून चालली आहेत. पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मका, कापूस, सोयाबीन, ऊस, बाजरी या पिकांना पाण्याची गरज असूनस शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. काही पिकांची खुरपणी पूर्ण होऊन पिकांनी कात टाकली आहे, पण आता पाऊस नसल्याने पिके करपू लागली आहेत. शेतकर्यांचा दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे.
जनावरांच्या चार्यासाठी शेतात लावलेला ऊसदेखील करपू लागला आहे. त्यामुळे जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे. विकत चारा घालण्याची वेळ आल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. पिकांवर पडलेला रोग, मजुरांची कमतरता, यामुळे फवारलेले तणनाशक, यामुळे शेतकर्यांना खूप आर्थिक खर्च आला आहे. त्यातून सावरण्यासाठी पावसाने साथ देणे गरजेचे आहे.
शेतकर्यांचा दूध व्यवसाय संकटात सापडला आहे. कांदा, कापूस, मका, सोयाबीन, बाजरी या पिकांसाठी केलेला खर्च वाया जाण्याची भीती आहे. सरकारने तत्काळ पिकांचे पंचनामे करुन अनुदान जाहिर करावे व जनावरांसाठी चारा डेपोची सोय करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. गावोगावी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई देखील निर्माण झाली आहे.
हेही वाचा
बलात्कार पीडितेला गर्भपात करण्यास सुप्रीम कोर्टाकडून परवानगी
आयुष्याच्या रंगमंचावर जीवनाचाच ‘तमाशा’; कलावंतांना जिवंतपणीच मरण यातना
सिंधुदुर्ग : पावशीत कार-मोटरसायकलचा अपघात, एक गंभीर
The post रूईछत्तीशी : पावसाअभावी खरीप पिके करपली appeared first on पुढारी.
http://dlvr.it/StxWdS
दादा भालेकर
टाकळी ढोकेश्वर(अहमदनगर) : पारनेर तालुक्यासह पिंपळगावरोठा, सावरगाव, काळेवाडी नांदूरपठार, पळसपूर, काताळवेढे या परिसरात पाऊस न झाल्यामुळे पारनेर तालुक्याला वरदान ठरलेले मांडओहळ धरण कोरडेठाक पडण्याच्या मार्गावर आहे. धरणात अवघा 8 टक्के पाणीसाठा शिल्लक असून, तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
टाकळी ढोकेश्वर, कर्जुले हर्या, कातळवेढे व पठारावरील 16 गावांची कान्हूर पठार या गावांना पाणी पुरवठा होत असलेली पाणीयोजना मांडओहळ धरणातून आहे. धरणात कमी प्रमाणात पाणी साठा शिल्लक असल्यामुळे पारनेर तालुक्यातील 73 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे. परतीचा पाऊस चांगल्या प्रमाणात झाला तरच तालुक्याचा पाण्याचा प्रश्न मिटेल. अन्यथा, 2019 प्रमाणे टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. पावसाअभावी शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.
मांडओहळ धरणाची मध्यम प्रकल्पाची साठवण क्षमता 399 दशलक्ष घनफूट, तर उपयुक्त साठा 310 दशलक्ष घनफूट आहे. वासुंदे, खडकवाडी, पळशी या गावांतील 2 हजार 200 हेक्टर लाभक्षेत्र त्यावर अवलंबून आहे. सन 2022 मध्ये जून, जुलै व ऑगस्ट मध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरण ओहरफ्लो झाले होते. परंतु, यावर्षी परिसरात पावसाने दडी मारल्याने धरणात अवघा 8 टक्के पाणीसाठा असल्याचे मांडओहळ प्रकल्पाचे शाखा अभियंता अभिजीत मोरे यांनी सांगितले. सन 1972 ला मांडओहळ धरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. सन 1983 ला धरणाचे काम पूर्ण झाले. धरणाची उंची 27.07 मीटर, लांबी 739.0 मीटर असून धरणासाठी 3 कोटी 62 लाख रुपये ऐकून खर्च झाला होता.
तालुक्यातील सर्व तलाव कोरडे!
पारनेर तालुक्यातील सर्वच तलाव सध्या कोरडेठाक आहेत. काळू प्रकल्प 38 टक्के, मांडओहळ 8 टक्के, तिखोल 0 टक्के, ढोकी एक 2 टक्के, ढोकी दोन 4 टक्के, भाळवणी 4 टक्के, मांडवे 0 टक्के, पळशी 1 टक्के असा पाणीसाठा शिल्लक आहे.
रूईचोंडा धबधबा पर्यटकांविना!
मांडओहळ धरण परिसरातील रुईचोंडा धबधबा पर्यटकांना भुरळ घालतो. निसर्गरम्य परिसर असल्याने मांडओहळ धरण व रूईचोंडा परिसरात नगरसह पुणे, मुंबई आदी ठिकाणांहून पर्यटक हजेरी लावतात. मात्र, पावसाने दडी मारल्याने रूईचोंडा धबधब्याकडे पर्यटक फिरकताना दिसत नाहीत.
हेही वाचा
पाथर्डी : ‘अतिक्रमण हटाव’ला हिरवा कंदिल; न्यायालयाने स्थगिती अर्ज फेटाळला
राहुल गांधी यांनी पेंगॉन्ग येथे राजीव गांधींना वाहिली श्रद्धांजली
आरोग्य : अनास्थेचे बळी
The post टाकळी ढोकेश्वर : मांडओहळ धरण पडणार कोरडेठाक! appeared first on पुढारी.
http://dlvr.it/StvVlC
कोपरगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : मौजे काकडी-मल्हारवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीत शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यापासून आजपर्यंत ग्रामपंचायतला कर स्वरूपात मिळणारी रक्कम देण्यात आलेली नाही. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाकडे ग्रामपंचायतीची मालमत्ता कराची सुमारे 7 कोटी रुपये थकबाकी असून, ती तातडीने ग्रामपंचायतला देण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. त्यावर सदर थकीत कराची रक्कम त्वरित देण्यात येईल, अशी ग्वाही फडणवीस व पवार यांनी दिली.
गुरुवारी काकडी येथे शिर्डी विमानतळालगत आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे आले असता, माजी आमदार कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली काकडी-मल्हारवाडी ग्रामपंचायतच्या पदाधिकार्यांच्या शिष्टमंडळाने त्यांना भेटून याबाबत निवेदन सादर केले. या शिष्टमंडळात काकडी ग्रामपंचायतच्या सरपंच पूर्वाताई गुंजाळ, उपसरपंच भाऊसाहेब सोनवणे, कानिफनाथ गुंजाळ, कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजय डांगे, ग्रा. पं. सदस्य बाळासाहेब मोरे, इंद्रभान गुंजाळ, दत्तात्रय गुंजाळ यांच्यासह ग्रामस्थ तसेच भाजप आणि विविध संस्थांच्या आजी-माजी पदाधिकार्यांचा समावेश होता.
शिर्डी हे जागतिक ख्यातीचे देवस्थान असून, येथे श्री साईबाबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून दररोज असंख्य भाविक येतात. शिर्डीला येणार्या साईभक्तांच्या सोयीसाठी कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना या विमानतळाचे काम पूर्ण झाले असून, त्यांच्याच कार्यकाळात 1 ऑक्टोबर 2017 रोजी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या विमानतळाचे लोकार्पण झाले होते.
थकीत रक्कम देण्याचे अश्वासन
ग्रामपंचायतची महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाकडे थकीत असलेली कराची सुमारे सात कोटी रुपयांची रक्कम तातडीने देण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी यावेळी शिष्टमंडळास दिले.
हेही वाचा
कोळ्याच्या शरीरातून उगवली मोडासारखी बुरशी
फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी काय खावे?
रात्रीच्यावेळी गोगलगायीकडून पिकं फस्त; शेतकऱ्याने काढले धक्कादायक व्हिडिओ
The post कोपरगाव : काकडी ग्रामपंचायतची रक्कम तातडीने देऊ : अजित पवार appeared first on पुढारी.
http://dlvr.it/StsX74
टाकळी ढोकेश्वर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : औषध विक्रेत्याने आपल्या दुकानात ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे लावणे बंधनकारक आहे. दुकानासह रस्त्याच्या बाजूने ‘सीसीटीव्ही’ लावल्यास गुन्हेगारीला चाप बसेल, असे प्रतिपादन पारनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सांगितले. यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे सहयक आयुक्त हेमंत मेतकर, औषध निरिक्षक डॉ. ज्ञानेश्वर दरंदले, माधव निमसे, जावेद शेख, केमिस्ट संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता गाडळकर, सचिव चेतन कर्डिले, उपाध्यक्ष शशिकांत रासकर, सी.ए. प्रसाद पुराणिक, पारनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय शेरकर, दादा भालेकर, गंगा धावडे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी पारनेर तालुका केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष शैलेंद्र औटी, उपाध्यक्ष दत्तप्रसाद सोनावळे, संकेत रोहोकले, संघटनेचे सदस्य रवींद्र बांडे, अनिल भंडारी, नीलेश झावरे, विकास बांडे, नितीन घुले, रवि रोहोकले, कमलेश जाधव, किरण गागरे, बाळासाहेब जगताप, राजेश ठोकळ, स्वामी धरम, सचिन ढोकळे, रवि गोरडे, संदीप रोहोकले, संकेत थोपटे, प्रथमेश पुरी, विकास भनगडे, शुभम निवडुंगे, सौरव व्यवहारे आदी उपस्थित होते. शैलेंद्र औटी यांनी प्रास्ताविक केले.
‘शासन निमयमांचे पालन आवश्यक’
सह आयुक्त हेमंत मेतकर यांनी प्रत्येक औषध विक्रेत्याने शासनाने दिलेल्या नियमानुसार काम करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
कोण काय म्हणाले..!
* निरिक्षक दरंदले यांनी व्यवसाय करताना ग्राहकाशी आपुलकीने संवाद साधत उत्तम सेवा दिली, तर व्यवसायात भरभराट होईल, असे सांगितले.
* आयुक्त बर्डे यांनी औषध विक्री करताना नियमानुसार करणे आवश्यक असल्याचे सांगितले. पारनेर तालुका संघटनेतर्फे आयोजित हा कार्यक्रम स्तुत्य आहे, असे सांगितले.
* सी.ए. पुराणिक यांनी इनकम टॅक्स, तसेच जीएसटी रिटर्न याविषयी सखोल माहिती दिली.
केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट संघटनेची सर्वसाधारण सभा
टाकळी ढोकेश्वर (ता.पारनेर) येथे पारनेर तालुका केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट संघटनेची सर्वसाधारण सभा झाली. अन्न व औषध प्रशासन आयुक्त अशोक बर्डे अध्यक्षस्थानी होते.
हेही वाचा
पिंपरी : डोमिसाईल, उत्पन्न दाखल्यांसाठी नागरिकांची धावपळ
जोगेश्वरवाडीत आमदार राम शिंदेंचा नागरी सन्मान
गोदावरी खोरे दुष्काळमुक्त करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
The post टाकळी ढोकेश्वर : ‘सीसीटीव्ही’ लावल्यास गुन्हेगारीला चाप बसणार appeared first on पुढारी.
http://dlvr.it/StpvBF
इयरफोन/ हेडफोन 🎧 के जैक में छल्ले क्यों होते हैं? By Right To Shiksha
via YouTube https://www.youtube.com/watch?v=1JytvIThr-0
पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात येत्या मंगळवारपासून (दि. 15) सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा निःशुल्क उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी दिली. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 28 डिसेंबर 2015 च्या शासन निर्णयानुसार सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये पुरविण्यात येत असलेल्या वैद्यकीय सेवा, तपासणी व त्याबाबतचे शुल्क निश्चित करण्यात आले होते.
यापुढे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रुग्णालयात रुग्णांना वैद्यकीय सेवा, तपासणीसाठी शुल्क द्यावे लागणार नाही. रुग्णांना देण्यात येणार्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील गरीब, आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना निःशुल्क उपचार मिळणार आहेत. राष्ट्रीय रक्त धोरणानुसार रक्त व रक्तघटक पुरवठा यासाठी आकारण्यात येणारे सेवाशुल्क वगळून शासकीय रुग्णालयांमधून करण्यात येणार्या तपासण्या व उपचार तसेच सार्वजनिक भागीदारी तत्त्वावरील वैद्यकीय सेवा निःशुल्क करण्यात येणार आहे.
शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा रुग्णालयात लवकरच निःशुल्क वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यापूर्वी या सेवेसाठी शासकीय दरानुसार शुल्क आकारले जात होते.
– डॉ. वर्षा डोईफोडे,
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, पुणे जिल्हा रुग्णालय.
हेही वाचा
वेगळी भूमिका घेणार्यांचीही भूमिका बदलू शकते : खा. शरद पवार
नाशिक : विडी कामगारनगरला चार लाखांचा गुटखा जप्त
चर्होली फाटा येथे बेशिस्त पार्किंग; वाहतुकीस अडथळा
The post पिंपरी : जिल्हा रुग्णालयात मिळणार मोफत उपचार appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Stm9Zv
राहुरी : पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीमधे कौटुंबिक वादातून पतीने पत्नी आणि सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पत्नी नूतन सागर साबळे (वय २३ वर्षे) तर सासु सुरेखा दिलीप दांगट (वय ४५ वर्षे)अशी मयतांची नावे आहेत. कात्रड गावामधे रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान धक्कादायक घटना घडली. सागर सुरेश साबळे याने आपल्या राहत्या (सासुरवाडीतील) घरात पत्नी आणि सासू झोपेत असतानाच डोक्यावर लोखंडी पहारीने वार करून ही हत्या केली असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे.
मुलीला बहिणीकडे सोडण्यासाठी आलेल्या मयत नूतन यांच्या भावाला ही धक्कादायक घटना निदर्शनास आली. दोन्ही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहिल्यानंतर घटनेची माहिती भावाने राहुरी पोलिसांना दिली. उप विभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक धनंजय जाधव, सहायक पोलीस निरीक्षक राजु लोखंडे, पोलीस उप निरीक्षक खोंडे हे तात्काळ पोलीस पथकासह घटनास्थळी पोहचले. आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली आहेत.
हेही वाचा :
हिमाचल, उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर; मृतांचा आकडा ६६ वर, शिमला, जोशीमठ येथे घरे कोसळली
नाशिक : महावितरण उभारणार आणखी पाच चार्जिंग स्टेशन; दोन स्टेशनचे काम पूर्णत्वाकडे
The post राहुरीमध्ये कौटुंबिक वादातून पतीने केली पत्नी आणि सासूची हत्या appeared first on पुढारी.
http://dlvr.it/StjYd6
नेवासा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नेवासा तालुक्यात यंदा 90 हजार 389 शेतकर्यांनी 63 हजार 723 हेक्टर क्षेत्रातील शेतपिकांचा विमा उतरविला आहे. गेल्या वर्षी 23 हजार शेतकर्यांनी पीक विमा उतरविला होता. त्या तुलनेत यंदा 67 हजार शेतकरी वाढले असून, उसाचे आगार म्हणून सर्वदूर ओळख असलेल्या नेवासा तालुक्यात पीक उत्पादनात कापूस व त्या खालोखाल सोयाबीन पिकाने मुसंडी मारल्याचे दिसत आहे.
मुळा, प्रवरा व जायकवाडी पश्चजल यामुळे चारही दिशांना पाटपाणी असलेल्या नेवासा तालुक्याची ओळख उसाच्या फडांचे आगार अशी आहे. तालुक्यातील मुळा व ज्ञानेश्वर या साखर कारखान्यांसह जिल्ह्यातील विखे, कोल्हे, काळे, अशोक, वृद्धेश्वर, तसेच गंगामाई, अंबालिकासह सर्वच खासगी साखर कारखाने नेवासा तालुक्यातून ऊस नेतात. यंदा मात्र कापूस, त्या खालोखाल सोयाबीन, बाजरी, तूर, मका ही पिके शेतकर्यांनी घेतली असल्याचे पीक विम्यातून स्पष्ट होत आहे. गेल्या वर्षी सततच्या पावसाने ऊस पिकाला दर एकरी उत्पादन व साखर उतार्यात झटका दिल्याने शेतकरी उसाकडे पाठ फिरवित अन्य पिकाकडे वळल्याचे दिसत आहे.
नेवासा तालुक्यात यंदाच्या पीक पेरणी अहवालात नेवासा मंडळात 11 हजार 762, सलाबतपूर मंडळात 9 हजार 171, कुकाणा मंडळात 9 हजार 327, तर घोडेगाव मंडळात 15 हजार 66, अशा एकूण 45 हजार 329 हेक्टरमध्ये कापूस, सोयाबीन, बाजरी, तूर, मूग, भुईमूग, उडीद व भाजीपाला पिके घेतली आहेत. पीक विम्यात तालुक्यात सर्वाधिक विमा 49 हजार 170 शेतकर्यांनी कापूस या पिकावर 34 हजार 312 हेक्टरसाठी घेतला आहे.
योजना फायदेशीर ठरणारी : ढगे
प्रधानमंत्री पीक विमा योजना एक रूपयात केल्याने शेतकरी सहभाग वाढला. महसूल, कृषी विभागाने त्यासाठी जनजागृती केली. तसेच आग, अतिवृष्टी, दुष्काळ या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी पिकांच्या नुकसानीचा परतावा म्हणून ही योजना फायदेशीर ठरणारी असून, विमा संरक्षित क्षेत्र करण्यात आले आहे, असे कृषी तज्ज्ञ डॉ. अशोक ढगे यांनी सांगितले.
हेही वाचा
अहमदनगर जिल्ह्यातील जलजीवनच्या 225 योजनांची यशस्वी चाचणी
संगमनेर : भगवंत प्राप्तीसाठी तळमळ महत्त्वाची : राठी महाराज
अहमदनगर जिल्ह्यामध्ये ‘लम्पी’चा पुन्हा कहर; 1243 जनावरे बाधित
The post नेवासा : पीक विम्यात कपाशी, सोयाबीनची मुसंडी! appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Stg5TN
जामखेड, पुढारी वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील बालाघाटच्या डोंगर रांगेत वसलेल्या जातेगाव येथील घाटात चार बिबट्यांचे दर्शन झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. जातेगावचे सरपंच रविराज गायकवाड व त्यांचे सहकारी सुशिल सखाराम गायकवाड हे खासगी कामानिमित्त बाहेरगावी गेले असता रात्री दीड ते दोनच्या सुमारास जातेगावच्या घाटात त्यांना चार बिबट्या आढळून आले. हे बिबटे दिघोळकडून मुंगेवाडी डोंगरात जाताना दिसले.
जातेगाव घाट हा वन विभागात असल्यामुळे व बालाघाटच्या डोंगररांगा असल्यामुळे हे बिबटे , हिंस्र प्राणी सर्रास वावर दिसून येतात. मध्यंतरी याच गतवर्षी या बिबट्यांनी नायगाव येथे दोन वानर व चार वासरांना हमला करून ठार केले होते. यानंतर काही बिबटे खर्डा किल्ला परिसरात दिसून आले. खर्डा व परिसरात बिबट्यांचा सततचा वावर असल्याने जनावरे चारण्यासाठी व शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सद्यस्थितीत पावसामुळे चारा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे शेतकरी डोंगर माथ्याकडे जनावरे चारण्यासाठी जात असतात. परंतु, या बिबट्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. गतवर्षी वनविभागाने पिंजरे लावले होते. परंतु, एकही बिबट्या पिंजऱ्यात पडला नव्हता. परंतु, काही महिन्यांपूर्वी मोहरी येथे एक बिबट्याचे पिल्लू मृत अवस्थेत आढळून आले होते. त्यामुळे जातेगाव व खर्डा परिसरातील शेतकऱ्यांनी रात्रीचे अथवा दिवसा एकटे बाहेर न जाता काळजी घेऊन फिरावे, असे आवाहन जातेगाव सरपंच रविराज गायकवाड यांनी केले.
पिंजरा लावून लवकरच बिबटे जेरबंद करू – वनपरिक्षेत्र आधिकारी मोहन शेळके
जातेगाव व खर्डा परिसरात बिबट्या आढळण्याचे समजते. दोन दिवस बिबट्याच्या पायाचे ठसे बघून त्या भागात पिंजरा लावून लवकरच बिबटे जे बंद करणार असल्याचे मोहन शेळके वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्जत जामखेड यांनी सांगितले.
हेही वाचलंत का?
* Anand Mahindra Share Video : आनंद महिंद्रांची ‘त्या’ व्हिडिओवर कमेंट, ‘मी इथे झोपू शकणार नाही’
* Jadavpur University Raging Case : रॅगिंगचा बळी ठरलेल्या विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी आणखी दोघांना अटक
The post अहमदनगर : जातेगाव घाटात चार बिबट्यांचे दर्शन, शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण appeared first on पुढारी.
http://dlvr.it/StbljB
श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : अशोक सहकारी साखर कारखान्याचे प्रवरा व संगमनेर साखर कारखान्या दिलेल्या थकीत एफआरपी द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी केली आहे. तसेच झोन बंदी उठविल्याने शेतकरी कोणत्याही कारखान्या ऊस देवू शकतो असे सांगत माजी आ. मुरकुटे यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. प्रसिध्दी दिलेल्या पत्रकात औताडे यांनी म्हटले की, अशोक सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये गाळपक्षमतेपेक्षा जास्त ऊस ऊस उत्पादकांनी उपलब्ध केलेने अशोक कारखाना संचालक मंडळाकडून सातत्याने गेली वीस वर्षापासून अतिरिक्त उसाच्या नोंदी घेऊन अशोक मार्फत संगमनेर- प्रवरा कारखाण्यांना ऊस दिला जातो. तसेच अशोक कारखान्या कडून कार्यक्षेत्रा बाहेरून अडीचशे किलोमीटर अंतराहून जालना जिल्ह्यातून ऊस आणला जातो.
आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस अशोक मार्फत दुसर्या कारखान्यांना द्यायचा व आपल्या कारखान्यांना बाहेरून अडीचशे ते तीनशे किलोमीटरवरून ऊस आणायचा याचा परिणाम तोड वाहतुकीवर होत असून अडीचशे ते तीनशे रुपये टन जास्त खर्च तोड वाहतुकीस येतो.परंतु अशोक मार्फत दिलेल्या बाहेरील कारखान्यांना उसाचे बाहेरील कारखाना जास्तीचे पेमेंट करूनही प्रत्यक्ष ऊस उत्पादक सभासदांना त्याचा लाभ होत नाही.
अशोक कारखान्याने अशोक कारखान्यात गाळप झालेल्या ऊस उत्पादक सभासदांचा थकीत एफआरपी 213 रुपये प्रति. मे. टन साखर आयुक्तांकडे तक्रार केल्याने व साखर आयुक्तांनी जप्तीचा कारवाई सुरू केल्याने तातडीने पेमेंट केलेले आहे. परंतु अशोक मार्फत बाहेरील दिलेल्या कारखान्याचे पेमेंट अद्याप झालेले नाही.तसेच अशोक कारखान्याचे चेअरमन यांचे कडून प्रवारा- संगमनेर कारखान्याला अशोकच्या कार्यक्षेत्रात घुसू देणार नाही असे वक्तव्य केले गेले. झोनबंदी उठल्याने कार्यक्षेत्राचा विषयच राहिलेला नाही म्हणजेच एकूण अशोक कारखान्यांच्या अध्यक्षांकडून ऊस उत्पादकांची दिशाभूल होत आहे.जो कारखाना जास्तीचा भाव देईल त्या कारखान्यांना ऊस घालण्याचा अधिकार ऊस उत्पादकांना आहे. उसाचा थकीत एफ आर पी संगमनेर कारखाना जो भाव देईल त्या दराने तातडीने अदा करावी, अशी मागणी औताडे यांनी केली आहे.
शेतकर्यांवर अन्याय होवू देणार नाही
अशोक कारखान्याचे सर्वेसर्वा माजी आमदार भानुदास मुरकुटे व शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी भारतीय राष्ट्रीय समित पक्षात प्रवेश केला आहे. दरम्यान, अशोक कारखान्याने शेतकर्यांवर अन्यायय केल्यास आपण आवाज उठविणार आहे. त्यासाठी कोणतीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी शेतकर्यांवर अन्याय होऊ देणार नाही, असा खुलासा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी केला आहे.
गाळपापेक्षा अधिकच्या नोंदी कशा?
झोंनबंदी उठलेली असताना अशोक अशोक कारखानाकडून गाळप क्षमतेपेक्षा अधिकच्या नोंदी कश्या घेतल्या जातात ? त्यास साखर आयुक्तांची परवानगी कशी मिळते ? याबाबी संशयास्पद असून याचा परिणाम सातत्याने हार्वेस्टिंग प्रोग्राम वर होत आहे. ऊस उत्पादकांचा व सभासदांचा वजनात घट येऊन साखर उताराही कमी होतो. सदर बाब बेकायदेशीर असल्याचे साखर आयुक्त यांना तक्रार केलेली आहे.
The post प्रवरा-संगमनेरला दिलेल्या उसाची एफआरपी द्यावी appeared first on पुढारी.
http://dlvr.it/StYzqg
Save Phone from Theft👽📱
#shorts #tech Main Channel - http://bit.ly/techburner
via YouTube https://www.youtube.com/watch?v=YcbwceYi4Gw
Saj ke Sawar ke| Khesari Lal yadav| Bhojpuri superhit song|Dancer vs Non Dancer|@atishsawant #shorts
#khesarilalyadav #khesarilalnewsong #sajkesawarke #pawansingh#bhojpurisong #viralreels #dance #youtubeshort
via YouTube https://www.youtube.com/watch?v=P7eTFHbcNfY
#viral 😎 #omtharpe🔥 #fan 😍 Dance at its best #wow 🔥✌️ #shorts
#viral 😎 #omtharpe🔥 #fan 😍 Dance at its best #wow 🔥✌️ #shorts #trending #banthan #oldisgold #bollywood
via YouTube https://www.youtube.com/watch?v=Las4KP2WPnI
Mai jish din bhula du
via YouTube https://www.youtube.com/watch?v=5HWz-gVNW5I
The shape of Shivlinga🙏#youtubeshorts #shorts
The shape of Shivlinga🙏 #omnamahshivaya #shiv #shiva #shivshankar #shivshakti #shivaaradhana #ram #ramadan #ramayan #sanatandharma #hindu #hinduism #trending #trendingshorts #trendingvideo #trend #trendingstatus #jaishreeram #jaishreeramshorts
via YouTube https://www.youtube.com/watch?v=2NGcnDwYshQ
पारनेर(नगर); पुढारी वृत्तसेवा : पारनेर बाजार समितीत तालुक्यातून वाटाण्याची मोठी आवक होत असून, शंभरी पार केलेल्या वाटाण्याचे भाव निम्म्याने उतरले आहेत. त्यामुळे शेतकरी नाराज झाले आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस न आल्यामुळे तालुक्यात नियमित घेतले जाणारे मुगाचे पीक घेतले गेले नाही जूनच्या शेवटच्या आठवड्यात काही भागात जेमतेम पाऊस झाल्याने या ठिकाणी वाटाणा पिकाकडे शेतकरी वळले. या वर्षी खराब हवामानामुळे उत्पादन क्षमता घटली आहे.
तालुक्यातील पारनेर, कान्हूरपठार, भाळवणी परिसर वाटाणा पिकासाठी मुख्य आगार मानला जातो. मात्र, या भागात पाऊस नसल्याने वाटाण्याची पेरणी कमी झाली. पारनेर परिसरात बुगेवाडी, सिद्धेश्वरवाडी, तराळवाडी, हंगे, वडनेर हवेली, गोरेगाव, डिसकळ आदी भागातील वाटाणा सध्या बाजारात येत आहे. पारनेर बाजार समितीने भाजीपाला व फुले खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकर्यांना जवळच मार्केट उपलब्ध झाल्याने वाहतूक खर्च वाचला. मात्र, दुसरीकडे आवक वाढून भाव कमी झाल्याने पिकाचे पैसे होत नसल्याने शेतकर्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
वाटाणा बियाण्याची चाळीस किलोची बॅग पाच हजार ते सहा हजार रुपयांपर्यंत शेतकर्यांनी खरेदी केली. एका वाटाण्याच्या गोणीला उत्पादन खर्च दहा ते बारा हजार रुपयांपर्यंत आला. मात्र, त्या तुलनेत भाव 50 ते 60 रुपये त्यादरम्यानच आले आहेत. ढगाळ हवामानामुळे पिकावर बुरशीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन कमी निघत आहे.
वाटाण्याची आवक वाढल्याने पुणे, मुंबई व इतर राज्यांत वाटाण्याचे भाव कमी झाले आहे. त्यामुळे पारनेरमध्येही भाव घसरले आहेत. भाजीपाला व फुलांच्या विक्रीसाठी पुणे, मुंबई येथे जाण्याची शेतकर्यांना गरज नाही.
– बाबाजी तरटे,
सभापती, पारनेर बाजार समिती
The post पारनेर बाजार समितीत वाटाण्याची मोठी आवक appeared first on पुढारी.
http://dlvr.it/StX3h4
वडगाव मावळ : मावळ तालुक्यात अद्ययावत क्रीडा संकुल व्हावे, यासाठी मागील तीन वर्षांपासून आमदार सुनील शेळके सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत असून आज (दि.9) मुंबई मंत्रालय येथे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांची भेट घेऊन क्रीडा संकुल उभारण्याच्या कामासंदर्भात संयुक्त आढावा बैठकीचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी आमदार शेळके यांनी केली. क्रीडा मंत्र्यांनी लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे सकारात्मक आश्वासन दिले असल्याचेही आमदार शेळके यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खेळात नैपुण्य प्राप्त करण्याच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, क्रीडाक्षेत्रात आपला नावलौकिक प्राप्त करता यावा, या उद्देशाने शासनाने ‘तालुका तिथे क्रीडा संकुल’ हे धोरण राबविले होते; परंतु मावळ तालुक्यात संकुल उभारण्याबाबत कुठलीही पावले उचलण्यात आली नव्हती.
आमदार शेळके यांनी सातत्याने यासाठी पाठपुरावा केला असून, पावसाळी अधिवेशनातदेखील प्रश्न उपस्थित केला व जांभूळ येथे क्रीडा संकुलासाठी जागा उपलब्ध करण्याची मागणी केली होती. मावळ तालुक्याला क्रीडा क्षेत्राची समृद्ध परंपरा असून अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तालुक्याचे नाव उज्वल केले आहे. क्रीडा स्पर्धांमध्ये शालेय स्तरापासून जागतिक स्तरापर्यंत यश मिळविण्यासाठी सुसज्ज क्रीडांगणाअभावी ग्रामीण भागातील मुलांना विविध स्पर्धांना मुकावे लागते. क्रीडाक्षेत्रातील कौशल्य असूनही केवळ अद्ययावत व सुसज्ज क्रीडासंकुल नसल्यामुळे उदयोन्मुख खेळांडुनादेखील अडचणी येत आहेत.
तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी जागा उपलब्ध करून अद्ययावत व सुसज्ज क्रीडा संकुल उभे राहिल्यास खेळाडूंना आवश्यक सुविधा मिळून आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार होतील. मागील तीन वर्षांपासून यासाठी पाठपुरावा करूनही अद्याप ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे तालुक्यात क्रीडा संकुल उभारणेबाबत क्रीडामंत्री बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची संयुक्त आढावा बैठक घेण्यात यावी, अशी मागणी आमदार शेळके यांनी केली.
हेही वाचा :
वाद एकाशी; हल्ला दुसऱ्यावरच ! स्वामी चिंचोली जवळील घटना
दिल्लीत महत्वपूर्ण ठिकाणी कलम 144 लागू
The post मावळ क्रीडा संकुलासाठी लवकरच संयुक्त बैठक appeared first on पुढारी.
http://dlvr.it/StTZPs
दिपक देवमाने
जामखेड : पुढारी वृत्तसेवा : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची आकडेवारी नुकतीच समोर आली असून देशातील गरिबांना रोजगार हक्काची हमी देणाऱ्या या योजनेत जामखेड तालुका हा अहमदनगर जिल्ह्यात सर्वप्रथम तसेच पुणे व नाशिक विभागात देखील अव्वल असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रत्येक जामखेडकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे. रोजगार हमी योजना ही ग्रामीण भागातील लोकांसाठी मोठा आधार ठरत असून यातून शासकीय अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वरुपाची कित्येक कामे पूर्ण करता येतात, हे आमदार रोहित पवार यांनी आपल्या मतदारसंघात दाखवून दिले आहे.
प्रत्येक सरकारी योजनेचा कर्जत-जामखेड मतदारसंघातील अधिकाधिक लोकांसाठी पुरेपूर उपयोग व्हावा, यासाठी आमदार रोहित पवार नेहमीच प्रयत्नशील असतात. ‘रोहयो’च्या माध्यमातूनही जास्तीत जास्त कामे मार्गी लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी कर्जत-जामखेड या दोन्ही तालुक्यात अनेक कार्यशाळा घेतल्या. यामध्ये अधिकारी, पदाधिकारी, रोजगार सेवक, समन्वयक या सर्वांच्या समन्वयाने रोजगार हमी योजनेअंतर्गत करायच्या विविध कामांचे नियोजन करण्यात आले. आमदार रोहित पवार यांचे वैयक्तिक लक्ष आणि प्रांताधिकारी, दोन्ही तालुक्यांचे तहसीलदार, दोन्ही तालुक्यांचे बीडीओ, कृषी अधिकारी आणि त्या-त्या विभागांचे सर्व कर्मचारी यांच्या नियोजनामुळे कर्जत-जामखेड हे दोन्ही तालुके ‘रोहयो’ अंतर्गत केलेल्या कामांमध्ये सध्या जिल्ह्यात आघाडीवर आहेत. जामखेडचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांचे या यशामध्ये विशेष योगदान आहे तसेच पूर्वीचे कर्जतचे गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनीही तालुक्यात रोजगार हमी योजना उत्तम प्रकारे राबवली. तसेच आता कार्यरत असलेले कर्जतचे गट विकास अधिकारी प्रदीप शेंडगे हे देखील सध्या चांगलं काम करत आहेत.
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शाळेला संरक्षक भिंत बांधणे, गायगोठा, शेळी पालनाचे शेड, कुक्कुटपालनाचे शेड, फळबाग, शेततळे, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड, विहीरी, शोषखड्डे, घरकूल इत्यादी कामे केली जातात व रोजगार उपलब्ध होतो. जामखेड तालुक्यातील वर्षभराच्या उद्दिष्टाच्या 327% उद्दिष्ट गेल्या 4 महिन्यात पूर्ण करून आजवरचा उच्चांक गाठला आहे. मागील चार महिन्यात दहा कोटींच्यावर खर्च झाला असून सर्वाधिक खर्च हा वैयक्तिक लाभाच्या योजनांवर करण्यात आला आहे. तसेच कर्जत तालुक्यात मागील चार महिन्यात 1.25 लाख मनुष्य दिनाची निर्मिती करण्यात आली असून गेल्या चार महिन्यात 6 कोटींच्या आसपास खर्च करण्यात आला आहे. ज्यामध्ये सर्वाधिक खर्च हा वैयक्तिक लाभाच्या योजनांवर केला आहे. यासोबतच वर्षभराच्या उद्दिष्टाच्या 111 टक्के उद्दिष्ट मागील चार महिन्यात कर्जत तालुक्यात पूर्ण करण्यात आले आहेत. अशा पद्धतीने जामखेड तालुका प्रथम क्रमांकावर तर कर्जत तालुका हा अहमदनगर जिल्ह्यात अनुक्रमे दुसऱ्या क्रमांकावर आहे.
अंगणवाडी अभिसरण अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच जामखेडमध्ये सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये कवडगाव, खर्डा व बांधखडक या गावांचा समावेश आहे. यासह यंदाच्या वर्षी किमान 50 शाळांना संरक्षण भिंतीचे काम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मागील महिन्यात राज्यात 49 व्या क्रमांकावर असणारे जामखेड ‘रोहयो’मध्ये आता 28 व्या क्रमांकावर आले आहे. ‘रोहयो’ अंतर्गत करायच्या कामांमध्ये समन्वय राखण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यात प्रत्येकी एक अशा दोन समन्वयकांची नेमणूक करुन अधिकाऱ्यांच्या सहकार्याने अधिकाधिक लोकांना काम देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अशा प्रकारे समन्वयक नेमणे आणि कार्यशाळा घेणे या दोन्ही गोष्टी केवळ कर्जत-जामखेड या दोन तालुक्यातच होत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळेच कर्जत-जामखेड हे दोन्ही तालुके रोहयोअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांमध्ये आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.
मतदारसंघातील शेवटच्या घटकापर्यंत सर्वच शासकीय योजनांचा फायदा करण्याचा प्रयत्न : आ रोहित पवार
मतदारसंघातील शेवटच्या घटकापर्यंत सर्वच शासकीय योजनांचा फायदा कसा पोहोचवता येईल, यासाठी मी नेहमीच प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. हे यश पाहिल्यानंतर एक समाधान वाटतं की अधिकारी आणि नागरिकांमध्ये आपण समन्वय साधून काम केलं तर त्याचा सामान्य नागरिकांना नक्कीच फायदा होतो. पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर पाहून लोकप्रतिनिधी म्हणून मनापासून आनंद वाटतो. हे यश मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे दोन्ही तालुक्याचे अधिकारी, कर्मचारी व समन्वयकांचे मी मनापासून अभिनंदन करतो व शुभेच्छा देतो.
हेही वाचा :
नगर : गणेशभक्तांना यंदा महागाईचा चटका
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण विद्यार्थी जनआंदोलन समितीकडून भव्य मोर्चा
The post मनरेगामध्ये जामखेड तालुका पुणे आणि नाशिक विभागात अव्वल; चार महिन्यात १० कोटींच्यावर खर्च appeared first on पुढारी.
http://dlvr.it/StQzD8
अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेत गेल्या 18 वर्षांनंतर रखडलेली पदभरती होणार असून, भरती प्रक्रिया राबविण्यासाठी टीसीएस(टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) संस्थेची नियुक्ती केली आहे. त्या संस्थेशी करार पूर्ण झाली आहे. येत्या एका महिन्यात 134 कर्मचारी-अधिकार्यांच्या पदांची भरती प्रक्रिया होणार असल्याचे सूत्रांकडून समजले. महापालिकेत सर्वच विभागात कर्मचार्यांनी वानवा आहे. गेल्या आठरा वर्षांपासून महापालिकेत नवीन पदभरती झाली नव्हती. महापालिकेच्या चार चार विभागाचा पदभार एकाच अधिकार्यांकडे सोपविण्यात आलेला आहे. तर, प्रभाग समिती कार्यालयात तोकड्या कर्मचार्यांना कामकाज सुरू आहे.
सर्वच विभागात कर्मचार्यांची कमतरता असून, त्याचा कामकाजावर परिणाम होत असल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. महापालिकेचे उत्पन्न आणि आस्थापनाप खर्च याचा ताळमेळ जुळत नसल्याने व आस्थापना खर्चच 35 टक्क्यांच्या पुढे जात असल्याने नगरविकास विभाग महापालिका पदभरतीला मंजुरी मिळत नव्हती. त्यामुळे आरोग्य, घनचकरा, उद्यान, विद्युत, अग्निशमन अशा अनेक विभगात गेल्या कित्तेक वर्षांपासून बाह्य संस्थेमार्फत कर्मचारी घेऊन कामकाज सुरू आहे. त्यात बाह्य संस्था वेळेत त्या कर्मचार्याना पगार देत नसल्याने अनेक वेळा काम बंद होत असल्याने त्याचा मनपाच्या कामकाजावर परिणाम होत होता.
महालिकेत सध्या 2870 पदे मंजूर आहेत. तर, सध्या 1600 कर्मचारी कार्यरत आहेत. सुमारे 1200 कर्मचार्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यात अवघ्या 135 कर्मचार्यांची भरती करण्यास शासनाच्या नगरविकास विभागाने मान्यता दिली आहे. कर्मचारी भरती प्रक्रिया राबविण्यासाठी टीसीएस कंपनीशी पत्रव्यवहार केला होता. त्याला कंपनीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, कंपनीने करार नाम्यात काही त्रुटी काढल्या होत्या. त्या त्रुटीची पूर्तता करून महापालिकेने करारनामा पुन्हा कंपनीकडे पाठविला असून, करारनामा पूर्ण झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता असल्याचे समजते.
पदे व संख्या अशी
स्त्रीरोग तज्ञ 1, भूलतज्ञ 1, पर्यावरण संवर्धन अधिकारी 1, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)2, अभियांत्रिकी सहाय्यक 8, आरेखक/आर्किटेक्चरल असिस्टंट 1, संगणक प्रोग्रॅमर 1, विद्युत पर्यवेक्षक 3, पाणी लॅबटेक्निशियन 6, लॅब टेक्निशियन 1, लॅब असिस्टंट 6, प्रदूषण नियंत्रण अधिकारी 1, पशुधन पर्यवेक्षक 1, लघुटंकलेखक 2, कनिष्ठ विधी अधिकारी 2, समाज विकास अधिकारी 1, सॅनिटरी सबइन्स्पेक्टर 12, सब ऑफिसर 1, ड्राव्हर ऑपरेटर 20, फ्रायरमन 50, लिपिक टंकलेखक 13.
महापालिकेत कर्मचारी पदभरतीसंदर्भात संबंधित कंपनीने पाठविलेल्या करारनाम्यात त्रुटी काढल्या होत्या. त्याची पूर्तता करून पुन्हा करारनामा कंपनीकडे पाठविला आहे. कंपनीने करारनाम्याचा स्वीकार केला असून, येत्या काही दिवसांत पुढील प्रक्रिया राबविण्यात येईल.
– डॉ. पंकज जावळे,
आयुक्त मनपा
हेही वाचा
शेवगाव : बोगस बिनशेती नोंदी कारवाईकडे दुर्लक्ष : अरूण मुंढे
अहमदनगर तालुक्यातील शाळेजवळ रोडरोमिओंंचा धुमाकूळ
अहमदनगर : जिल्हाधिकार्यांसह 160 जणांना अवयवदानाची इच्छा
The post अहमदनगर : मनपासाठी मनुष्यबळाचा मार्ग मोकळा appeared first on पुढारी.
http://dlvr.it/StNPmp
Do you want a partner #LLAShorts 637
Subscribe to the FREE Success Circle Newsletter by LLA 👇 https://link.lla.in/newsletter ▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀ Start your Investing Journey with the best Brokers👇 Zerodha: https://link.lla.in/zerodha Upstox: https://link.lla.in/upstox Other Investment Options: https://link.labourlawadvisor.in/investment ▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀ Insurance is Important, Get one Now! 👇 Term Insurance: https://link.lla.in/Term-insurance Health Insurance: https://link.lla.in/health-insurance Vehicle (Car/Bike) Insurance: https://link.lla.in/policy Choose the right Insurance for yourself: https://link.lla.in/LLA-PL-life-insurance ▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀ 📚COURSES: https://link.lla.in/lpti ▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀ Free AI Newsletter: http://link.lla.in/newsletter ▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀ Employment Consultancy, Contract Review, Salary Structure Review: https://www.consult.lla.in/ ▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀ Checkout LLA Courses, Videos & Apps: https://link.lla.in/shorts ▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀ QuickPayroll: https://quickpayroll.in/ ▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀ Do you want a partner ▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀ Shot & Edited by: Rohan Agarwal, Naveen Agarwal Presented by: Money-Minded Mandeep ▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀ Follow us on Social Media📲 Twitter: https://link.lla.in/LLAtwitter Instagram: https://link.lla.in/LLAinsta Telegram: https://t.me/JoinLLA Facebook: https://link.lla.in/LLAFB #Shorts #LLA #deliverypartner
via YouTube https://www.youtube.com/watch?v=9YwIDZ01OSE
Exciting Upcoming Indian Sci-Fi Movies #sifimovies #upcomingmovies #projectk
via YouTube https://www.youtube.com/watch?v=emIBOvAMXGc
कोळपेवाडी : पुढारी वृत्तसेवा : अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत कोपरगाव रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी दिलेल्या 29.94 कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात येणार्या कामाचे भूमिपूजन रविवार (दि.6) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते (ऑनलाईन) पार पडले. यावेळी आ. आशुतोष काळे म्हणाले, रेल्वे प्रवाशांसह कोपरगाव रेल्वे स्टेशनच्या विविध समस्यांबाबत रेल्वेकडे केलेल्या पाठपुराव्यातून बहुतांश समस्या सोडविल्या आहेत. अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत 29.94 कोटी रुपयांच्या निधीतून कोपरगाव रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासातून कोपरगाव मतदार संघाच्या अर्थकारणाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आ. काळे म्हणाले, रेल्वे स्टेशनच्या समस्याबाबत केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव रेल्वे स्टेशनच्या लिफ्टचे काम प्रगतीपथावर आहे. एक्स्ट्रा ट्रॅकसाठी 3 नंबर प्लॅटफॉर्मची निर्मितीची केलेली मागणी पूर्ण झाली. अंतर्गत रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. स्वच्छतेचा प्रश्नदेखील सुटला. नवीन डोम बांधले आहेत. गुड्स लाईन वाढवण्यात आली आदी मागण्या पूर्ण झाल्या. अनेक सोयी -सुविधा रेल्वे प्रवाशांना कोपरगाव रेल्वे स्टेशनवर मिळत आहेत. यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये निश्चितपणे समाधानाचे वातावरण आहे. अमृत भारत स्थानक योजनेत नवीन पादचारी पुलाची मागणी केली होती, ती मागणी मान्य करण्यात आली. नवा पादचारी पूल होणार आहे. याबद्दल त्यांनी आभार मानले.
कोपरगाव- रोटेगाव रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर कोपरगावला दक्षिण भारत जोडला जाणार आहे. माजी आ. अशोकराव काळे यांच्या प्रयत्नातून त्यांच्या कार्यकाळात कोपरगाव तालुक्यात विमानतळाची निर्मिती होवून दुष्काळी भागाचा विकास झाला.कोपरगाव मतदार संघाचा अधिक विकास साधण्यासाठी कोपरगाव रोटेगाव रेल्वे लाईनचा सर्वे तातडीने पूर्ण करून या कामास गती देणे गरजेचे आहे. दक्षिण भारताचे प्रमुख केंद्र म्हणून कोपरगाव-रोटेगाव रेल्वे मार्गाकडे पाहिले जाते. कोपरगाव-रोटेगाव रेल्वे मार्गामुळे संपूर्ण दक्षिण भारत कोपरगावला जोडला जावून कोपरगाव मतदार संघाचा अधिक विकास होणार आहे. याची दखल घेवून या कामाला गती द्यावी. राज्य व परराज्यातून शिर्डी येथे येणारे लाखो भाविक कोपरगाव रेल्वे स्टेशवरुन मोठ्या प्रमाणावर ये-जा करीत असल्यामुळे कोपरगाव रेल्वे स्टेशनचा विकास होणे गरजेचे होते.
यावेळी खा. सदाशिव लोखंडे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता मोहम्मद फैज, स्टेशन प्रबंधक डी. एस. प्रसाद, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य कैलास ठोळे, सुनील कोल्हे, सेवासिंह सहानी, धनंजय कहार आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कर्मवीर काळे साखर कारखाना व संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक व कोपरगाव शहरासह तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.
कोपरगावच्या वैभवामध्ये भर पडणार..!
रेल्वे स्टेशनचा विकास झाल्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या नविन संधी उपलब्ध उपलब्ध होवून, कोपरगाव शहराच्या वैभवात निश्चितपणे भर पडणार आहे. यामुळे केलेल्या पाठपुराव्याची दखल घेवून अमृत भारत स्थानक योजनेत कोपरगाव रेल्वे स्टेशनचा समावेश केल्याबद्दल केंद्र सरकार व राज्य सरकारचे आ. आशुतोष काळे यांनी आभार मानले. कोपरगाव रेल्वे स्टेशनच्या इतरही समस्या मांडून या समस्या देखील रेल्वे विभागाने त्वरीत सोडविण्याची आ. काळे यांनी मागणी केली.
The post रेल्वे कामांचे पंतप्रधान मोदींकडून उद्घाटन ! आ. आशुतोष काळे appeared first on पुढारी.
http://dlvr.it/StKntT
संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : सध्या देशात व राज्यात सुरू असणारे फोडाफोडीचे राजकारण महाराष्ट्रातील जनतेला अजिबात मान्य नाही अशा या फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल जनतेत तीव्र स्वरूपाचा रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे काँग्रेसला भवितव्य चांगले अस ल्याचा विश्वास काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला
संगमनेर तालुक्याचे लोकप्रतिनिधी माजी महसूलमंत्री आ बाळासाहेब थोरात यांची विधिमंडळ पक्षनेते पदी फेरनिवड झाल्याबद्दल सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहाच्या प्रांगणात संगमनेर तालुक्यातील जनतेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्याआला त्यावेळी आयोजित कार्यक्र मात ते बोलत होते. यावेळी माजी आ डॉ सुधीर तांबे ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, एकवीरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ जयश्री थोरात बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर थोरात साखर कारखान्याची व्हा चेअरमन संतोष हासे रामहरी कातोरे सुभाषसांगळे सोमेश्वर दिवटे मिलिंद कानवडे अजय फटांगरे सिद्राम दिड्डी कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर,अमृतवाहिनी शेती व शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारीअधिकारी अनिल शिंदे यांच्यासह अमृत उद्योग समू हातील व संगमनेर तालुक्या तील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार थोरात म्हणाले की, काँग्रेस पक्षाला त्यागाची व बलिदानाची परंपरा असून यापक्षाने सर्वसामान्यांच्या विकासा साठी कायम काम केले आहे.आपणकधी ही पदाला महत्त्व दिले नसून जनतेच्या कामांना प्राधान्य दिले आहे. पक्षातील सर्वांना बरोबर घेऊन काम केले. जनतेचे प्रेम व नेतृत्वाचा विश्वास यामुळे राज्यात अनेक मंत्री पदावर काम करण्याची संधी काँग्रेसच्या नेतृत्वांनी आपल्याला दिलेली आहे . त्या संधीचा उपयोग आपण कायम सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठीकेला आहे. काँग्रेस पक्षात तरुणांना मोठी संधी असून देशांमध्ये परिवर्तनाची लाट निर्माण झाली आहे .2024 मध्ये देशात आणि राज्यात नक्कीच काँग्रेस पक्ष नंबर एकचा असेल असे सांगताना महाराष्ट्रात महावि कास आघाडीचे सरकारच सत्तेवर येईल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माजी आमदार डॉ तांबे म्हणाले की आ बाळासाहेब थोरात यांनी अत्यंत अड चणीच्या काळात पक्षाचे नेतृत्व करताना पक्षाला चांगले यश मिळवून दिले आहे. काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर जी जबाबदारी टाकली ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे त्यामुळे त्यांना आगामी काळामध्ये राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅन्सर तज्ञ डॉ जयश्रीताई थोरात यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर तालुका ध्यक्ष मिलिंद कानवडे यांनी आभार मानले.
The post संगमनेर : काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल आमदार थोरात यांचा सत्कार appeared first on पुढारी.
http://dlvr.it/StHPMK
शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : कामगार विभागाकडे 16 हजार कोटी रुपये आहेत. त्यातील अडीच हजार कोटी मध्यान्ह भोजन योजनेच्या ठेकेदाराला दिले. मात्र, ही योजना फसवी आहे. कामगारांच्या खात्यावर मध्यान्ह भोजनचे अनुदान दर आठवड्याला जमा करावे. त्यांच्या नावे पाच ते दहा लाखांचा विमा उतरवावा. लागू करण्यात आलेल्या सर्व योजनांचा त्यांना लाभ द्यावा, अशा विविध मागण्या अॅड. शिवाजीराव काकडे यांनी केल्या. शेवगाव येथे जनशक्ती श्रमिक संघटना आयोजित नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या जन आक्रोश मोर्चा मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जगन्नाथ गावडे, संजय दुधाडे, विष्णू दिवटे, दादा दिवटे, नवनाथ खेडकर, कारभारी मरकड, अकबर शेख, भारत लांडे, सुनील गवळी, मीरा गडाख, सत्यभामा जाधव, सुलभा उगले, अलका परदेशी यांच्यासह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आगामी काळात असंघटीत कामगारांच्या कामासाठी संघटन वाढविण्याचे आवाहन काकडे यांनी यावेळी केले. तर, आमंत्रित करूनही कामगार विभागाचे अधिकारी उपस्थित न राहिल्याने त्यांचा निषेध करण्यात आला. काकडे म्हणाले, कामगार माझा श्वास व ध्यास आहे. आपण पदाच्या अपेक्षेने कार्य करत नाही. सत्ता येईल जाईल, मात्र सत्ता भोगणार्यांनी फक्त नकला करण्याचा कार्यक्रम केला. नऊ गावांच्या ताजनापूर टप्पा-2च्या पाण्यासाठी क्रांतीदिनी जलसंधारण कार्यालयासमोर मुक्काम ठोको आंदोलन करण्याचा इशारा अॅड. काकडे यांनी दिला. तसेच आमची बांधिलकी कामगारांशी आहे. काकडे कुटूंब नेहमी कामगार, कष्टकरी, शेतकर्यांसाठी राबते. सध्या गल्लाभरू, पोटभरू, मतभरूंचा सुळसुळाट झाला आहे.
जनतेला असली-नकली सारे समजते. कुठल्याही राजकीय पाठबळाशिवाय राजकारण व संघर्ष आमच्या रूपात कामगारांनी जिवंत ठेवला आहे. जिल्हा परिषदे व्यतिरिक्त कोणतेही मोठे पद मिळाले नाही. तरीही तालुक्यात इतिहास घडविला. आमच्यात मतदार संघ नव्हे, तर राज्य बदलण्याची ताकद आहे.
..तर पूर्ण इस्टेट त्यांच्या नावावर करू
संघर्ष करून सहाशे कोटी रूपयांच्या ताजनापूर टप्पा-2 योजनेत अनेक गावे घेतली. कोणीही याबाबत आवाज उठविला नाही. उठविला असेल तर त्यांनी सांगावे. हे खरे झाल्यास मी माझी पूर्ण इस्टेट त्यांच्या नावावर करील, असे आव्हान अॅड. काकडे यांनी दिले.
The post मध्यान्ह भोजनचे अनुदान जमा करा : अॅड. शिवाजीराव काकडे appeared first on पुढारी.
http://dlvr.it/StFg1Y
संगमनेर, पुढारी वृत्तसेवा : जलजीवन मिशन योजनेसाठी आलेल्या पाईपांच्या संरक्षणासाठी ठेकेदार कंपनीने कुठल्याही प्रकारच्या सुरक्षा रक्षकाची नियुक्ती केली नसल्यामुळे या योजनेचे ३० लाख रुपये किमतीचे चोरीला गेले आहेत. हा पाईप वेल्हाळे शिवारातून चोरीला गेले आहेत. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
संगमनेर तालुक्यातील वेल्हाळेसह निमगाव भोजापूर व इतर तीन गावांसाठी जल जीवन मिशन योजनेच्याअंतर्गत जल जीवन योजनेचे वेल्हाळे शिवारातील भांड मळा या ठिकाणी चालू आहे. हे काम संगमनेर येथील आर.एम कातोरे अँड कंपनीला देण्यात आलेले आहे. या योजनेसाठी ईलेक्टोस्टील कास्टींग लिमीटेड कंपनीचे ५.५ मिटर लांबीचे तसेच १०० MM DI K7 डायचे, ४ ईची असणारे पाईप १४ जुलै रोजी १८२ पाईप तर २३ जुलै रोजी २८८ असे एकूण ४७० पाईप आले होते. हे सर्व पाईप वेल्हाळे शिवारातील इथापे कॉलेजच्या पाठीमागे असणाऱ्या भांड मळ्यात ठेवण्यात आले होते.
तीस लाख रुपये किमतीचे असणाऱ्या जलजीवन योजनेच्या पाईपांची सुरक्षाकर ण्यासाठी ठेकेदार कंपनीने सुरक्षा रक्षकाची नेमणूक करणे गरजेचे होते. परंतु या ठेकेदार कंपनीने कुठल्याही सुरक्षा रक्षकाची नेमणूक केलेली नव्हती. मात्र, अधूनमधून या ठेकेदार कंपनीचे अभियंता अंकेत वाकचौरे हे लक्ष ठेवत होते वाकचौरे हे १ ऑगस्टला कामानिमित्ताने भांड मळा या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी जल जीवन योजनेचे पाईप आढळून आले त्या नंतर पुन्हा ते ३ ऑगस्ट रोजी त्याठिकाणी गेले होते. त्यांना त्या ठिकाणी पाईप आढळून आले नाही. त्यानंतर वाकचौरे व ठेके दार कंपनीच्या कामगारांनी परिसराच्या आसपास चोरीला गेलेल्या पायपांचाशोध घेतला असता ते मिळून आले नाही. याबाबत आर. एम. कातोरे अँड कंपनीचे अभियंता अंकेत वाकचौरे यांनी शहर पोलीस साथ दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचलंत का?
* Nashik Collector Jalaj Sharma : जिल्हाधिकाऱ्यांनी ४ किमीची पायपीट करत गाठली अतिदुर्गम खैरेवाडी
* Tomato Price Hike : टोमॅटोची चोरी रोखण्यासाठी शेतात बसविला सीसीटीव्ही कॅमेरा; शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग
The post अहमदनगर : जलजीवन योजनेचे ३० लाखाचे पाईप गेले चोरीला appeared first on पुढारी.
http://dlvr.it/StCnG9
कोपरगाव (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : शहर पोलिसांनी 6 चोरट्यांना अटक करुन त्यांच्याकडून 5 मोटारसायकली जप्त केल्या. मोटार सायकल सर्व चोरटे तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील आहेत. पोलिसांनी चोरट्यांसह मोटारसायकली विकत घेणार्यांनाही आरोपी केले आहे. कोपरगाव शहर पोलिस स्टेशनला (दि.24 मे) रोजी सागर धनिशराम पंडोरे (रा. ब्राम्हणगाव, ता. कोपरगाव) यांनी मोटारसायकल नं. ( MII 17 CG 1134) चोरी गेल्याची तक्रार दिली होती. त्या अनुशंगाने शहर पोलिस ठाण्यात गुरनं. 255/2023 भादंवी कलम 379 प्रमाणे दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास सुरु असताना शहर पोलिस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, कोपरगाव येथून चोरीस गेलेली दुचाकी वाहने ही (सिन्नर, जि. नाशिक) भागामध्ये विकली आहेत.
माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने सिन्नर येथे जाऊन संशयीत आरोपी व वाहनांचा शोध घेतला असता, संशयीत गणेश जेजुरकर यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने दोन साथीदार दिनेश राजेंद्र आहेर (वय 30 वर्षे, रा. ब्राम्हणगाव, ता. कोपरगाव) व अजित कैलास जेजुरकर (वय 24 वर्षे, रा. ब्राम्हणगाव, ता. कोपरगाव) यांच्या मदतीने मोटारसायकल चोरल्याचे कबुल केल्याने या दोन संशयीत इसमांना तत्काळ ताब्यात घेतले.
दरम्यान, या तिन्ही आरोपींकडे मोटारसायकल चोरीच्या अनुशंगाने सखोल चौकशी केली असता त्यांनी 5 मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. चोरलेल्या मोटारसायकल (शिरपूर, जि. धुळे) येथे विकल्याची माहिती दिल्याने प्रविण सुका कोळी (वय 32 वर्षे), प्रमोद झुंबरलाल कोळी (वय 23 वर्षे), हर्षल राजेंद्र राजपुत (वय 23 वर्षे, तिन्ही रा. उपपिंड, ता. शिवपूर, जि. धुळे) यांना ताब्यात घेत त्यांनी विकत घेतलेल्या मोटारसायकल गुन्ह्याच्या तपासात जप्त केल्या.
या गुन्ह्याच्या तपासामध्ये एकुण 6 आरोपी अटक केले. त्यांच्याकडुन चोरलेल्या 5 मोटार सायकल जप्त केल्या आहेत. दोन मोटारसायकल आरोपींनी कोपरगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीतुन, 2 मोटारसायकल कोपरगाव ग्रामीण पोलिस स्टेशन तर 1 मोटारसायकल येवला ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतून चोरली. ही कारवाई पोलिस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधिक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. रामराव ढिकले, पो. स. ई. रोहिदास ठोंबरे, भरत दाते, पोहेकाँ डी. आर. तिकोने, ए.एम. दारकुंडे, महेश गोडसे, जालिंदर तमनर, संभाजी शिंदे, ज्ञानेश्वर भांगरे, विलास मासाळ, एम.आर.फड, बाळु घोंगडे, राम खारतोडे व जी.व्ही. काकडे यांनी यशस्वी केली.
चोरीचे आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता
पोलिसांनी ताब्यात घेतलेले सर्व आरोपी पोलिस कोठडीमध्ये आहेत. या गुन्ह्याचा तपास सुरु आहे. या आरोपींकडून मोटारसायकल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. कोपरगाव शहरासह तालुक्यात मोटारसायकल चोरीचे गुन्हे सर्रास होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
हेही वाचा :
नगर : सायबर गुन्ह्यांबाबत सावधगिरी बाळगा
माणुसकी हरवली ! अपघातानंतर मदत करण्याऐवजी लोक काढत राहिले फोटो
The post कोपरगावात दुचाकी चोरट्यांची टोळी जेरबंद appeared first on पुढारी.
http://dlvr.it/St7g8r
पुढारी वृत्तसेवा : नगर : अहमदनगर शहरामध्ये गुन्हेगारीच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीये, जीवघेणे हल्ले, खून, दरोडे, मारामारी यासारख्या घटना दिवसाढवळ्या घडत आहे. आज बुधवारी दुपारच्या सुमारास न्यू आर्ट्स कॉलेज महाविद्यालयाच्या बाहेरील परिसराच्या आवारात एका तरुणावर काही इसमानी धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. यामध्ये महाविद्यालयीन युवराज गुंजाळ (रा. सोनेवाडी) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. त्याला अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. कोयता हल्ला करणाऱ्या आरोपींचा शोध तोफखाना पोलीस घेत आहे.
The post नगर : शहरात महाविद्यालयाच्या आवारात तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला appeared first on पुढारी.
http://dlvr.it/St51Gk
अहमदनगर; पुढारी वृत्त्तसेवा : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेने मिशन आपुलकी अंतर्गत शिक्षक बँकेच्या सेस फंडातून जिल्ह्यातील 28 प्राथमिक शाळांना इंटरॅक्टिव बोर्ड वाटपाचा जो निर्णय घेतला आहे, तो स्तुत्य असून जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावत आहे. इंग्रजी माध्यमातील मुलांचा ओढा मराठी शाळेकडे वाढला आहे, हि निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव लांगोरे यांनी केले.
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या वतीने इंटरॅक्टिव्ह बोर्ड वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, उपलेखा अधिकारी रमेश कासार, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, गटशिक्षणाधिकारी अनिल भवार, शिक्षण विस्तार अधिकारी मनीषा कुलट, शिक्षक बँकेचे चेअरमन डॉ. संदीप मोटे, व्हा. चेअरमन कैलास सारोक्ते यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
संभाजीराव लांगोरे म्हणाले की, जिल्ह्यातील जवळपास एक हजार शाळांना इंटरॅक्टिव्ह बोर्ड मिशन आपुलकीतून प्राप्त झाला आहे. जवळपास लोक सहभागातून जिल्हा परिषदेतील शाळांनी 21 कोटीच्या आसपास निधी जमा केला. यावरूनच शिक्षकांप्रती समाजात असलेले आदराची भावना आणि शैक्षणिक दर्जा यामुळेच ही एवढी मोठी वर्गणी जमा झाली.
शिक्षणाधिकारी भास्कर पाटील म्हणाले की, शिक्षक बँकेने ठरल्याप्रमाणे शब्द पाळून 28 प्राथमिक शाळांना इंटरॅक्टिव्ह बोर्ड देऊन शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी एक चांगले पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे लक्ष दिल्यामुळे स्कॉलरशिप परीक्षेत अहमदनगर जिल्हा परिषदेचा राज्यात तिसरा क्रमांक आला आहे. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा जिल्हा परिषदेचे विद्यार्थी पुढे जातात. यापुढे शिक्षकांना दैनंदिन माहिती देण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही.
पद्वारेच महिन्यातून एकदाच माहिती अपडेट केली की पुन्हा वारंवार माहिती द्यावी लागणार नाही. त्यामुळे शिक्षकांना ज्ञानदानाच्या कार्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. यावेळी शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या सूचनेप्रमाणे सेस फंडातून इंटरॅक्टिव्ह बोर्ड वाटपाचा संकल्प केला. त्याची परिपूर्ती करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. शिक्षकांना जास्तीत जास्त ज्ञानदानासाठी वेळ मिळाला पाहिजे , त्यांच्याकडील अतिरिक्त कामे कमी झाली पाहिजेत.
यासाठी आपल्या जिल्हा परिषदेने आपल्या जिल्ह्यामध्ये उपक्रम सुरू करून आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदाच माहिती जर संकलित केली, तर शिक्षकांना तीच ती माहिती वारंवार द्यावी लागणार नाही. एवढ्या मोठ्या अडचणीवर मात करून अहमदनगर जिल्हा परिषदेतील सर्व शिक्षक यांनी शाळेचा कायापालट केला असून शाळेच्या गुणवत्तेमध्ये राज्यांमध्ये एक आगळावेगळे स्थान निर्माण केले आहे.
प्रास्ताविक डॉ. संदीप मोटे यांनी करून शिक्षक बँकेचा लेखाजोखा सभागृहासमोर मांडला. यावेळी राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखिले व एरंडोली शाळेचे तंत्रस्नेही शिक्षक भंडारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी शिक्षक बँकेचे माजी चेअरमन गोकुळ कळमकर, संतोष दुसुंगे, अर्जुनराव शिरसाट, बाबासाहेब खरात, आर. टी. साबळे, आबासाहेब दळवी, बाळासाहेब कदम, शरद वांडेकर, मुकेश गडदे, राजेंद्र निमसे, रमेश दरेकर, संभाजी आढाव,शिक्षक बँकेचे संचालक भाऊराव रहिंज, बाळासाहेब सरोदे, शशिकांत जेजुरकर, बाळासाहेब कापसे, ज्ञानेश्वर शिरसाठ, रमेश गोरे कल्याण लवांडे, गोरक्षनाथ विटनोर, योगेश वाघमारे, महेश भनभने, संतोष राऊत, बाळासाहेब तापकीर, सूर्यकांत काळे, कारभारी बाबर, कैलास सहाने, माणिक कदम, रामेश्वर चोपडे, अण्णासाहेब आभाळे,सचिन नाबगे, संदीप मेहेत्रे, निवृत्ती धुमाळ, रविकिरण साळवे, बाबासाहेब दिघे, विठ्ठल काकडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन शिक्षक बँकेचे माजी चेअरमन साहेबराव अनाप यांनी केले तर आभार संचालक भाऊराव राहिंज यांनी मानले.यावेळी 28 शाळातील मुख्याध्यापक, तंत्रस्नेही शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ,सरपंच आदि पदाधिकारी उपस्थित होते.
The post अहमदनगर : मिशन आपुलकीत शिक्षक बँकही पुढे.! appeared first on पुढारी.
http://dlvr.it/St2MNl